संपादक : आचार्य विराज शांताराम
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । परा प्रमेयप्रमदा- । विलासिया ।।१।। नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या- । लालनलीला ।।२।। नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । स्वजनवनचंदना । आराध्यलिंगा ।।३।। नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ।।४।। नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ।।५।। तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथि ।।६।। दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरसदीपांचा । थावो लाभे ।।७।। जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगीकारी । तो वाचस्पतीसीं करी । प्रबंधुहोडा ।।८।। हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरू माथां पारुखे । तो जीवचि परी तुके । महेशेंशीं ।।९।। एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाळपणे वानूं मी कवणें । कां सूर्याचिया अंगा उटणें । लागत असे ।।१०।। केउता कल्पतरुवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरू क्षीरसागरा । ऐसा कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ।।११।। चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं ।।१२।। तैसे श्रीगुरुचे महिमान । आकळितें कें असे साधन । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ।।१३।। जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसमर्थारूप म्हणे । तरी मोतियांसी भिंग देणें । तैसें होईल ।।१४।। कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं । उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ।।१५।। मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ।।१६।। मागां दूध दे म्हणितलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटीं । ठेविली जैसी ।।१७।। ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ।।१८।। तैसी ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोविया गावों । ऐसें केलें ।।१९।। जे बोलणियाचां रानीं हिंडतां । नायकीजे फळलिया अक्षरांची वार्ता । परी ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ।।२०।। होती देहबुद्धी एकसरी । आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ।।२१।। तैसें एकेक देवांचें करणें । अपार बोलों केविं मी जाणें । त-ही अनुवादलों धीटपणें । जे उपसाहिजो जी ।।२२।। आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्गीता वोवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ।।२३।। प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परी सांख्यबुद्धीसी भेदु । दाऊनियां ।।२४।। तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थी ज्ञानेंसीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्व ।।२५।। तेंचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवाट । होती जेणें ।।२६।। तैसीचि जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती । ते आघवीचि उपपत्तीं । सांगितली ।।२७।। तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चा-ही ।।२८।। पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं ।।२९।। आतां शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ।।३०।। आतां अठरां पर्वीं भारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावोे गीते सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ।।३१।। म्हणोनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मी वायां । गर्व कां करूं ।।३२।। अहो गुळासाखरे मालेयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परी स्वाद गोडियेचे । आनआन जैसें ।।३३।। एक जाणोनियां बोलती । एक ठायेंठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ।।३४।। हे ऐसे अध्याय गीतेचे । परी अनिर्वाच्य नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभु ।।३५।। कां एकाची काठी तपिन्नली । एकीं सृष्टिवरी सृष्टि केली । एकीं पाषाण वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ।।३६।। एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं समुद्र चुळी भरिले । तैसें मज नेणतयाकरवी बोलविलें । अनिर्वाच्य तुम्ही ।।३७।। परी हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैंसें । राम रावण जैसे । मीनले समरीं ।।३८।। तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वज्ञु जाणे । जया गीतार्थु हातीं ।।३९।। एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उपाइलें । ग्रंथाचें ऐका ।।४०।। येथ विभूतीप्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ।।४१।। देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरी ओविया होती लेणें । साहित्यासी ।।४२।। मूळग्रंथींचिया संस्कृता । वरी मऱ्हाटी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमीं हें न चोजवे ।।४३।। जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणियासी अंगचि होय लेणें । अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ।।४४।। तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाचां सोकासनी । शोभती आयणी । चोखट आइका ।।४५।। उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ।।४६।। तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि रसां आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ।।४७।। तैसा चराचरपरमगुरु । चतुरचित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरू । बोलता जाहला ।।४८।। ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । काई बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाचि मातु अंत:करणें । धडौता आहासी ।।४९।।
श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वच: ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ।।१।।
आम्ही मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तंव टांचें नव्हे भलें । पुरतें आहे ।।५०।। घटीं थोडेंसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ।।५१।। अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझें । निजधाम कीं ।।५२।। तैसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें आदरें । गिरी देखोनि सुभरे । मेघु जैसा ।।५३।। तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ।।५४।। प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । पिकासी निवाडू देखिजे । अधिकाधिक ।।५५।। पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । ते सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ।।५६।। तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ।।५७।। अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें ते काय जाणे । तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ।।५८।। तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावें । तंव तंव आमुचे सुख दुणावें । ऐसें असे ।।५९।। आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ।।६०।। आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परी असो हें अंत:करणें । अवधान दे ।।६१।। ऐकें ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें परम । जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज खेंवासि आलें ।।६२।। तरी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरी गा जो मी एथें । तें विश्वचि हें ।।६३।।
न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ।।२।।
एथ वेद मुके जाहले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी ।।६४।। उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा । देवांसि मी तैसा । चोजवेना ।।६५।। आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवे गगन । तैसे महर्षीचें ज्ञान । नेणे मातें ।।६६।। मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला । निरुती या करितां बोला । युगे गेली ।।६७।। महर्षी आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणोनि पांडवा । जाणतां अवघड ।।६८।। उतरलें उदक पर्वत वळघें । का वाढते झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ।।६९।। कां गाभेवनें वटु गिंवसवे । तरंगीं सागरू सांठवे । कां परमाणुमाजीं सामावे । भूगोलु हा ।।७०।। तरी मियां जालिया जीवां । महर्षी अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ।।७१।। ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढील पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ।।७२।। प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ।।७३।।
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढ: स मर्त्येषु सर्वपापै: प्रमुच्यते ।।३।।
तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखे । अजत्व माझें देखे । आपुलिये डोळां ।।७४।। मी आदिसीं परु । सकळ लोकमहेश्वरू । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणे ।।७५।। तो पाषाणांमाजीं परिसु । रसाआंतु सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । माझाचि जाण ।।७६।। तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परी माणूसपणाचि भांब । लौकाचि भागु ।।७७।। अगा अवचितां कापुरा- । माजी सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ।।७८।। तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । त-ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ।।७९।। तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तेविं मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ।।८०।। तेंचि माते कैसें जाणिजें । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐकें ।।८१।। जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेति त्रिजगती । आघविये ।।८२।।
बुद्धिर्ज्ञानमसंमोह: क्षमा सत्यं दम: शम: ।
सुखं दु:खं भवोऽभावो भयं चाभयमेव च ।।४।।
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयश: ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा: ।।५।।
ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ।।८३।। मग शम दम दोन्ही । सुखदु:ख वर्तत जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ।।८४।। आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पंडुसुता । ओळख तूं ।।८५।। दान यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र वसती । ते मजचिपासूनि होती । भूतांचां ठायीं ।।८६।। जैसीं भूतें आहाती सिनानीं । तैसेंचि हे वेगळाले मानीं । एक उपजती माझां ज्ञानीं । एक नेणती मातें ।।८७।। अगा प्रकाश आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ।।८८।। आणि माझें जे जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवांचे करणें । म्हणोनि भूतीं भावाचे होणें । विषम पडे ।।८९।। यापरी माझां भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ।।९०।। आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ।।९१।।
महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा: प्रजा: ।।६।।
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ।।९२।। आणिकही सांगिजतील । जे चौदा आंतील । स्वयंभू मुख्य मुदल । चारी मनु ।।९३।। ऐसे हे अकरा । माझां मनीं जाहले धनुर्धरा । सृष्टिचिया व्यापारा- । लागोनियां ।।९४।। जैं लोकांची ये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे । तैं भूताभूतांचें दळवाडें । अचुंबित असे ।।९५।। तैंचि हे जाहाले । इहीं लोकपाळ केले । अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ।।९६।। म्हणोनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारू माझा । ओळख तूं ।।९७।। पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ।।९८।। खांदियांपासूनि अनेका । पसरिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लव पानें ।।९९।। पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहलें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि ते ।।१००।। ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें । तेथ सप्तऋषी जाहले । आणि चारी मनु ।।१।। इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक स्रजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ।।२।। ऐसेनि हें विश्व येथें । मीचि प्रसवलोना निरुतें । परी भावाचेनि हातें । माने जया ।।३।।
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वत: ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय: ।।७।।
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्व ।।४।। म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ।।५।। ऐसें जाणे जो साचें । तया चेयिरें जाहलें ज्ञानाचें । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें । दु:स्वप्न तया ।।६।। मी माझिया विभूति । आणि विभूतीं व्यष्टलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ।।७।। म्हणोनि नि:शंकें येणें महायोगें । मज मीनला मनोचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । जो त्रिशुद्धी जाहला ।।८।। कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज ।।९।। म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ।।११०।। तोचि अभेदु कैंसा । हे जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ।।११।।
अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता: ।।८।।
तरी मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ।।१२।। कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तया जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ।।१३।। ऐसें आघवांचि ठायीं । तयां जळचि जेविं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ।।१४।। ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परी साचोकारें उदितें । प्रेमभावें ।।१५।। देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायू होऊनि गगन । गगनींचि विचरे ।।१६।। ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ।।१७।। जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हो भक्तियोगु निश्चित जाण माझा ।।१८।।
मच्चित्ता मद् गतप्राणा बोधयन्त: परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ।।९।।
चित्तें मीचि जाहले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ।।१९।। मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ।।१२०।। जैसीं जवळिकेचीं सरोवरें । उचंबळलियां कालवती परस्परें । मग तरंगासीं धवळारें । तरंगचि होती ।।२१।। तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथें बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ।।२२।। जैसें सूर्यें सूर्यातें वोवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । नातरी सरिसेनि पाडें मिनले । दोनी ओघ ।।२३।। तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ।।२४।। तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवांबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ।।२५।। पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाचि वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंघ ।।२६।। जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणे । दे राया रंका पारणें । आमोदाचें ।।२७।। तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ।।२८।। ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ।।२९।।
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।१०।।
तयां मग जें आम्ही कांही । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायिंचीच तिहीं । घेतली सेल ।।१३०।। कां जे ते जिया वाटा । निघाले गा सुभटा । ते सोय पाहूनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ।।३१।। म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परी आम्ही देयावें हेंही केलें । तिहींचि म्हणियें ।।३२।। आतां यावरी येतुले घडे । जें तेंचि सुख आगळें वाढे । आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ।।३३।। लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवें ।।३४।। तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ।।३५।। जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ।।३६।। पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीचि चाड । कां जें प्रेमळाचें सांकड । आमतें घरीं ।।३७।। पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयांचिये वाहणी केले । आम्ही आंगही शेषा वेंचिलें । लक्ष्मीयेसी ।।३८।। परी आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळांलागीं देख । ठेविलें जतन ।।३९।। हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ।।१४०।।
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तम: ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ।।११।।
म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ।।४१।। तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चाले ।।४२।। अज्ञानाचिये राती- । माजीं तमाची मिळणी दाटती । ते नाशूनि घाली परौती । करी नित्योदयो ।।४३।। ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ।।४४।। अहो जी अवधारा । भला केरू फेडिला संसारा । जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ।।४५।। जी जन्मलेंपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हाता चढलें । आवडतसें ।।४६।। आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ।।४७।। आतां येणें वचनतेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ।।४८।।
अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ।।१२।।
तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम । पवित्र तूं परम । जगन्नाथा ।।४९।। तूं परमदैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा । दिव्य तूं प्रकृतिभावा । पैलीकडील ।।१५०।। अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं । तो तूं हें आम्हीं । जाणितलें आतां ।।५१।। तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाह धात्री । हें कळलें फुडें ।।५२।।
आहुस्त्वामृषय: सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे ।।१३।।
पैं आणिकही एके परी । इयेचि प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ।।५३।। परी तया सांगितलियाचें साचपण । हे आतां देखतसें अंत:करण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ।।५४।। ए-हवीं नारदु अखंड जवळां यें । तोही ऐसीचि वचने गाये । परी अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ।।५५।। हां गा अंधळ्यांचां गांवीं । आपणपें प्रगटले रवि । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ।।५६।। ए-हवीं देवर्षिही अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसी जे मधुरता तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांही ।।५७।। पैं असिता देवलाचेनहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परी तैं बुद्धी विषयविखें । घारिली होती ।।५८।। विषयविषाचा पडिपाडु । गोड परमार्थु लागे कडु । कडु विषय तो गोडु । जीवासि जाहला ।।५९।। आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदां सांगिजे ।।१६०।। परी तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेविं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणोनि ।।६१।। तैसीं व्यासादिकांची बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी । परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा ।।६२।।
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: ।।१४।।
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवेयांचेंचि फिटलें । अनोळखपण ।।६३।। जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माझिये हृदयभूमिके पडिले सखोल । वरी इये कृपेची जाहली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ।।६४।। अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरिता । मी महोदधी जालों अनंता । संवादसुखाचा ।।६५।। प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें । तयांची न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ।।६६।। ये-हवी वडीलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें । परी कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेंचि कांहीं ।।६७।। म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ।।६८।। जी बनकरू झाडेंसी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी । परी फळेंसीं तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ।।६९।। अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडें । पैं रसायने तैं गोडें । जेव्हां आरोग्य देहीं ।।१७०।। कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण । जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ।।७१।। तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जैं अभ्यासिलें । तें तैंचि म्हणो ये आपुलें । जैं सानुकूळ गुरू ।।७२।। ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचीं नाचतुसे भोंजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ।।७३।। तरी साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तूं देवां देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ।।७४।। तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । आपुलिया जाणे जाणिवा । तैंसा कहींचि नाही हें सद्भावा । भरंवसेनि आलें ।।७५।।
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।।१५।।
एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें । कां मी येतुली घनवट ऐेसें । पृथ्वीचि जाणे ।।७६।। तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वायां ।।७७।। हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं ।।७८।। तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकते नोहे । आतां तुझे ज्ञान होये । तुजचि जोगें ।।७९।। जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकांतें सांगावयाही तू समर्थ होसी । तरी आतां एकवेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ।।१८०।। हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभूवनगजपंचानना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ।।८१।। जरी थोरी तुझी पाहत आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों । या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ।।८२।। भरले सरिता समुद्र चहूंकडे । परी तें बापियासि कोरडें । कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया ।।८३।। तैसें गुरू जी सर्वत्र आथि । परी कृष्णा आम्हां तूंचि गती । हे असो मजप्रती । विभूति सांगें ।।८४।।
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतय: ।
याभिर्विभूतिभिर्लाेकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ।।१६।।
जी तुझिया विभूती आघविया । परी व्यापिती या शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ।।८५।। जिहीं विभूति ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करी ।।८६।।
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ।।१७।।
जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदां चिंतावेें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरी चिंतनचि न घडे ।।८७।। म्हणोनि मागां भाव जैसें । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसें । एकवेळ । बोलें ।।८८।। जया जया भावांचां ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवळ करूनि देर्इं । योगु आपुला ।।८९।।
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूय: कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ।।१८।।
आणि पुसलिया जिया विभूति । त्याही बोलाविया भूपती । एथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ।।१९०।। तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवें जी ।।९१।। जें काळकुटाचें सहोदर । हें मृत्युभेणें प्याले अमर । तरी दिहाचे पुरंदर । चौदा जाती ।।९२।। ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मिठांशु । जे पुरे म्हणों नेदी ।।९३।। तया पाबळेयाहि येतुलेवरी । गोडियेची आथि थोरी । मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ।।९४।। जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरू न डहुळितां । अनादि स्वभावता । आइतें आहे ।।९५।। जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ।।९६।। जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ।।९७।। जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय नि:शेख । आंत बाहेरि महासुख । वाढोंचि लागे ।।९८।। मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरे म्हणों न शके ।।९९।। तंव तुझे नामचि जी आम्हां आवडे । वरी भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरंवाडें । आनंदाचेनी ।।२००।। आतां हे सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरी येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ।।१।। हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा । कां नित्य वाहतया गंगाजळा । पारसेंपण असे ।।२।। तुवां स्वमुखें जें बोलिलें । हें आम्ही नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां ।।३।। तया पार्थाचिया बोला । सर्वांगें श्रीकृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ।।४।। ऐसा पतिकराचिया तोषाआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु । तो सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ।।५।।
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय: ।
प्राधान्यत: कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ।।१९।।
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवें चित्ता । कीं म्हणतसे बा पांडुसुता । भलें केलें ।।६।। अर्जुनातें बा म्हणे एथकांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । अंगें तो लेकरूं काई । नव्हेचि नंदाचें ।।७।। परी प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ।।८।। तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परी माझिये मती । आकळती ना ।।९।। अंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ।।२१०।। ए-हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें ।।११।। जिया जाणितलियासाठीं । आघविया जाणितलिया किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरुचि आला होय ।।१२।। कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडतीं फळें फुलें । तेविं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ।।१३।। ए-हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।।१४।।
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित: ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ।।२०।।
आइकें कुटिलालकमस्तका । धर्नुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैकां । भूतमात्राचां ठायीं ।।१५।। आंतुलीकडे मीचि यांचां अंत:करणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ।।१६।। जैसें मेघां या तळीवरीं । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जालें । अवधारीं । असणेंही आकाशीं ।।१७।। पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेविं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ।।१८।। ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतीयोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ।।१९।। याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रति । सांगेन म्हणितलें तुजप्रीती । त्या प्रधाना आइकें ।।२२०।।
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ।।२१।।
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणें विष्णु मी आदित्यांआंतु । रवि मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ।।२१।। मरुद्गणांचां वर्गीं । मरीचि म्हणे मी शारंगी । चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं ।।२२।।
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासव: ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ।।२२।।
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजीं मरुद्बंधु । महेंद्र तो मी ।।२३।। इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ।।२४।।
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरु: शिखरिणामहम ।।२३।।
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ।।२५।। यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ।।२६।। मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।।२७।।
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्द: सरसामस्मि सागर: ।।२४।।
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय: ।।२५।।
जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदिचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ।।२८।। त्रिभुवनींचिया सेनापती- । आंत स्कंधु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकांतु जाहला ।।२९।। सकळिकां सरोसरांसी । माझारि समुद्र तो मी जळराशी । महर्षीआंतु तपोराशी । भृगु तो मी ।।२३०।। अशेषांही वाचा- । आंतु नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठीचा । वेल्हाळु म्हणे ।।३१।। समस्तांही यज्ञांचां पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ।।३२।। नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ।।३३।। स्थावरां गिरीवरांआंतु । पुण्यपूज्य जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मीयेचा ।।३४।।
अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद: ।
गन्धर्वाणां चित्ररथ: सिद्धानां कपिलो मुनि: ।।२६।।
उच्चै:श्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ।।२७।।
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरी ययां वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ।।३५।। देवऋषीआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वा । सकळिकांमाजीं ।।३६।। ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उच्चै:श्रवा मी ।।३७।। राज्यभूषणां गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशि सुरमथितु । अमृतांशु तो मी ।।३८।। ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ।।३९।।
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्प: सर्पाणामस्मि वासुकि: ।।२८।।
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यम: संयमतामहम् ।।२९।।
पैं आघवेया हातियेरां- । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ।।२४०।। धेनूंमध्यें कामधेनु । ते मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयां आंत मदनु । तो मी जाणें ।।४१।। सर्पकुळाआंतु अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ।।४२।। अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ।।४३।। आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वतां । बोलत आहें ।।४४।। जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांचिया मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ।।४५।। तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ।।४६।।
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ।।३०।।
अगा दैत्यांचिया कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं । म्हणोनि दैत्यभावादि मेळीं । लिंपेचिना ।।४७।। पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांआंतु शार्दुळु । तो मी जाण ।।४८।। पक्षिजातीमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ।।४९।।
पवन: पवतामस्मि राम: शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाङ्घवी ।।३१।।
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडी न लगतां धनुर्धरा । एकेंचि उड्डाणें सातांही सागरां । प्रदक्षिणा करी जो ।।२५०।। तयां वहिलियां गतिमंतां- । आंतु पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजी श्रीराम तो मी ।।५१।। जेणें सांकडलिया धर्माचेनि कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ।।५२।। पाठीं उभें ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधलीं भूतां ।।५३।। जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ।।५४।। तो हतियेरुपरजितयांआंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ।।५५।। पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जङ्घूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ।।५६।। ते त्रिभुवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ।।५७।। ऐसेनि वेगळालां सृष्टिपैकीं । विभूती नाम सुतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोंकी । अर्घ्या नव्हती ।।५८।।
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वाद: प्रवदतामहम् ।।३२।।
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्व: सामासिकस्य च ।
अहमेवाक्षय: कालो धाताहं विश्वतोमुख: ।।३३।।
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ।।५९।। कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरी भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पाहावा । तरी जाणावें मातें ।।२६०।। जैसें शाखांसी फूल फळ । एकीहेळा वेटाळूं म्हणिजे सकळ । तरी उपडूनियां मूळ । जेविं हातीं घेपे ।।६१।। तेविं माझे विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ।।६२।। ए-हवीं वेगळालिया विभूती । कायि एक परिससी किती । म्हणोनि एकीहेळां महामती । सर्व मी जाण ।।६३।। मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेविं ।।६४।। ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परी हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ।।६५।। कां जे तुवां पुसलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ।।६६।। अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकळशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ।।६७।। जो निर्वचूं जातां वाढे । आइकिलियां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होती ।।६८।। ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांआंतु विशदु । अकारू तो मी ।।६९।। पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ।।२७०।। मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ।।७१।। जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरिटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ।।७२।। ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ।।७३।।
मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा ।।३४।।
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ।।७४।। आतां स्त्रीगणांचां पैंकी । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ।।७५।। तरी निच नवी जे किर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसीं जे संपत्ती । तेही मीचि जाणें ।।७६।। आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचां । आरूढोनि विवेकाचां । मार्गीं चाले ।।७७।। देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही पै एथें । त्रिशुद्धी मी ।।७८।। पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ।।७९।। एवं नारीमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ।।२८०।।
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: ।।३५।।
वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ।।८१।। गायत्रीछंद जे म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ।।८२।। मासांआंत मार्गशिरु । तो मी म्हणे शारंगधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ।।८३।।
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ।।३६।।
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजय: ।
मुनीनामप्यहं व्यास: कवीनामुशना कवि: ।।३७।।
छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणोनि चोहटा चोरी परी कवणा । निवारूं न ये ।।८४।। अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ।।८५।। जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझेंचि स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ।।८६।। सत्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजी श्रीमंतु । तोचि तो मी ।।८७।। जो देवकी वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ।।८८।। नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मिया अदानवी सृष्टि केली । करी गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ।।८९।। कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ।।२९०।। प्रथम दशेचिये पहांटे-। माजी कंसाऐसीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ।।९१।। हें काय किती एक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरी यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ।।९२।। आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ।।९३।। संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । त-हीं विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ।।९४।। मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य मी ।।९५।।
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ।।३८।।
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ।।९६।। पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळ शास्त्रांमाजीं यया । नीतिशास्त्र तें मी ।।९७।। आघवियाचि गूढां- । आंतु मौन तें मी सुहाडा । म्हणोनि न बोलतयां पुढां । स्रष्टाही नेण होय ।।९८।। अगा ज्ञानियांचां ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ।।९९।।
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ।।३९।।
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।।४०।।
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ।।३००।। पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेविं गा । तेविं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ।।१।। ऐशियाही सात पांच या प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ।।२।। येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणोनि परिससी तूं काई । आम्ही सांगों किती ।।३।। यालागि एकीहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज । सर्वभूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ।।४।। म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ।।५।। तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण । तरी अर्जुना तें तूं जाण । विभूती माझी ।।६।।
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ।।४१।।
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ।।७।।
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।।४२।।
अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेविं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ।।८।। तयांतें एकलें झणीं म्हण । तो निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ।९।। तियेतें जें जेधवां जो मागे । ते ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेविं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ।।३१०।। तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ।।११।। आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ।।१२।। तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैंसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ।।१३।। ए-हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें । हां गा वायूसि काय डावें । उजवे अंग आहे ।।१४।। पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहातां नासेल आपुली दिठी । तेविं माझां स्वरूपीं गोठीं । सामान्यविशेषाची नाहीं ।।१५।। आणि सिनाना विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असों हे जाणणें ।।१६।। आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ।।१७।। ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ।।१८।। तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हे राभस्य बोलिलेती तुम्हीं । जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं ।।१९।। हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । केवी धसाळ म्हणों देवा तूंते । तरी अधिक हा बोलु ।।३२०।। तुझें नांवचि एक कोण्ही वेळें । जयांचिये मुखासि कां काना मिळे । तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ।।२१।। तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ।।२२।। जी चंद्रबिंबाचां गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारंगधरा । बोला हें तुम्ही ।।२३।। तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ।।२४।। आम्ही तुज भेदाचिया वाहाणी । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंत:करणीं । मानिली कीं न मने ।।२५।। हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ।।२६।। येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ।।२७।। पैं राया तो पंडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ।।२८।। कीं संजयो दुखवलेनि अंत:करणें । म्हणतसे नवल नव्हे दैवा दवडणें । हा जीवें धडसा आहे मी म्हणे । तंव आंतुही आंधळा ।।२९।। परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवीतसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ।।३३०।। म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरि अवतरों कां डोळ्यांप्रति । इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ।।३१।। मियां इहींच दोंहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो दैवा आगळा । म्हणऊनि करी ।।३२।। आजि तो कल्पतरुची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साच करीतसे येरु ।।३३।। जो प्रल्हादाचिया बोला । विषाही सकट आपण जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसीं ।।३४।। म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ।।३३५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्याय: ।।१०।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहावा समाप्त ।। (श्लोक ४२, ओव्या ३३५)
।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।
श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वच: ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ।।१।।
आम्ही मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तंव टांचें नव्हे भलें । पुरतें आहे ।।५०।। घटीं थोडेंसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ।।५१।। अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझें । निजधाम कीं ।।५२।। तैसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें आदरें । गिरी देखोनि सुभरे । मेघु जैसा ।।५३।। तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ।।५४।। प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । पिकासी निवाडू देखिजे । अधिकाधिक ।।५५।। पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । ते सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ।।५६।। तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ।।५७।। अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें ते काय जाणे । तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ।।५८।। तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावें । तंव तंव आमुचे सुख दुणावें । ऐसें असे ।।५९।। आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ।।६०।। आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परी असो हें अंत:करणें । अवधान दे ।।६१।। ऐकें ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें परम । जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज खेंवासि आलें ।।६२।। तरी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरी गा जो मी एथें । तें विश्वचि हें ।।६३।।
न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ।।२।।
एथ वेद मुके जाहले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी ।।६४।। उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा । देवांसि मी तैसा । चोजवेना ।।६५।। आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवे गगन । तैसे महर्षीचें ज्ञान । नेणे मातें ।।६६।। मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला । निरुती या करितां बोला । युगे गेली ।।६७।। महर्षी आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणोनि पांडवा । जाणतां अवघड ।।६८।। उतरलें उदक पर्वत वळघें । का वाढते झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ।।६९।। कां गाभेवनें वटु गिंवसवे । तरंगीं सागरू सांठवे । कां परमाणुमाजीं सामावे । भूगोलु हा ।।७०।। तरी मियां जालिया जीवां । महर्षी अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ।।७१।। ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढील पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ।।७२।। प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ।।७३।।
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढ: स मर्त्येषु सर्वपापै: प्रमुच्यते ।।३।।
तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखे । अजत्व माझें देखे । आपुलिये डोळां ।।७४।। मी आदिसीं परु । सकळ लोकमहेश्वरू । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणे ।।७५।। तो पाषाणांमाजीं परिसु । रसाआंतु सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । माझाचि जाण ।।७६।। तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परी माणूसपणाचि भांब । लौकाचि भागु ।।७७।। अगा अवचितां कापुरा- । माजी सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ।।७८।। तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । त-ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ।।७९।। तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तेविं मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ।।८०।। तेंचि माते कैसें जाणिजें । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐकें ।।८१।। जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेति त्रिजगती । आघविये ।।८२।।
बुद्धिर्ज्ञानमसंमोह: क्षमा सत्यं दम: शम: ।
सुखं दु:खं भवोऽभावो भयं चाभयमेव च ।।४।।
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयश: ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा: ।।५।।
ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ।।८३।। मग शम दम दोन्ही । सुखदु:ख वर्तत जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ।।८४।। आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पंडुसुता । ओळख तूं ।।८५।। दान यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र वसती । ते मजचिपासूनि होती । भूतांचां ठायीं ।।८६।। जैसीं भूतें आहाती सिनानीं । तैसेंचि हे वेगळाले मानीं । एक उपजती माझां ज्ञानीं । एक नेणती मातें ।।८७।। अगा प्रकाश आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ।।८८।। आणि माझें जे जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवांचे करणें । म्हणोनि भूतीं भावाचे होणें । विषम पडे ।।८९।। यापरी माझां भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ।।९०।। आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ।।९१।।
महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा: प्रजा: ।।६।।
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ।।९२।। आणिकही सांगिजतील । जे चौदा आंतील । स्वयंभू मुख्य मुदल । चारी मनु ।।९३।। ऐसे हे अकरा । माझां मनीं जाहले धनुर्धरा । सृष्टिचिया व्यापारा- । लागोनियां ।।९४।। जैं लोकांची ये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे । तैं भूताभूतांचें दळवाडें । अचुंबित असे ।।९५।। तैंचि हे जाहाले । इहीं लोकपाळ केले । अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ।।९६।। म्हणोनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारू माझा । ओळख तूं ।।९७।। पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ।।९८।। खांदियांपासूनि अनेका । पसरिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लव पानें ।।९९।। पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहलें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि ते ।।१००।। ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें । तेथ सप्तऋषी जाहले । आणि चारी मनु ।।१।। इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक स्रजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ।।२।। ऐसेनि हें विश्व येथें । मीचि प्रसवलोना निरुतें । परी भावाचेनि हातें । माने जया ।।३।।
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वत: ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय: ।।७।।
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्व ।।४।। म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ।।५।। ऐसें जाणे जो साचें । तया चेयिरें जाहलें ज्ञानाचें । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें । दु:स्वप्न तया ।।६।। मी माझिया विभूति । आणि विभूतीं व्यष्टलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ।।७।। म्हणोनि नि:शंकें येणें महायोगें । मज मीनला मनोचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । जो त्रिशुद्धी जाहला ।।८।। कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज ।।९।। म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ।।११०।। तोचि अभेदु कैंसा । हे जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ।।११।।
अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता: ।।८।।
तरी मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ।।१२।। कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तया जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ।।१३।। ऐसें आघवांचि ठायीं । तयां जळचि जेविं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ।।१४।। ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परी साचोकारें उदितें । प्रेमभावें ।।१५।। देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायू होऊनि गगन । गगनींचि विचरे ।।१६।। ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ।।१७।। जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हो भक्तियोगु निश्चित जाण माझा ।।१८।।
मच्चित्ता मद् गतप्राणा बोधयन्त: परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ।।९।।
चित्तें मीचि जाहले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ।।१९।। मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ।।१२०।। जैसीं जवळिकेचीं सरोवरें । उचंबळलियां कालवती परस्परें । मग तरंगासीं धवळारें । तरंगचि होती ।।२१।। तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथें बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ।।२२।। जैसें सूर्यें सूर्यातें वोवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । नातरी सरिसेनि पाडें मिनले । दोनी ओघ ।।२३।। तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ।।२४।। तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवांबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ।।२५।। पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाचि वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंघ ।।२६।। जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणे । दे राया रंका पारणें । आमोदाचें ।।२७।। तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ।।२८।। ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ।।२९।।
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।१०।।
तयां मग जें आम्ही कांही । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायिंचीच तिहीं । घेतली सेल ।।१३०।। कां जे ते जिया वाटा । निघाले गा सुभटा । ते सोय पाहूनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ।।३१।। म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परी आम्ही देयावें हेंही केलें । तिहींचि म्हणियें ।।३२।। आतां यावरी येतुले घडे । जें तेंचि सुख आगळें वाढे । आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ।।३३।। लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवें ।।३४।। तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ।।३५।। जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ।।३६।। पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीचि चाड । कां जें प्रेमळाचें सांकड । आमतें घरीं ।।३७।। पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयांचिये वाहणी केले । आम्ही आंगही शेषा वेंचिलें । लक्ष्मीयेसी ।।३८।। परी आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळांलागीं देख । ठेविलें जतन ।।३९।। हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ।।१४०।।
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तम: ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ।।११।।
म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ।।४१।। तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चाले ।।४२।। अज्ञानाचिये राती- । माजीं तमाची मिळणी दाटती । ते नाशूनि घाली परौती । करी नित्योदयो ।।४३।। ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ।।४४।। अहो जी अवधारा । भला केरू फेडिला संसारा । जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ।।४५।। जी जन्मलेंपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हाता चढलें । आवडतसें ।।४६।। आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ।।४७।। आतां येणें वचनतेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ।।४८।।
अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ।।१२।।
तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम । पवित्र तूं परम । जगन्नाथा ।।४९।। तूं परमदैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा । दिव्य तूं प्रकृतिभावा । पैलीकडील ।।१५०।। अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं । तो तूं हें आम्हीं । जाणितलें आतां ।।५१।। तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाह धात्री । हें कळलें फुडें ।।५२।।
आहुस्त्वामृषय: सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे ।।१३।।
पैं आणिकही एके परी । इयेचि प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ।।५३।। परी तया सांगितलियाचें साचपण । हे आतां देखतसें अंत:करण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ।।५४।। ए-हवीं नारदु अखंड जवळां यें । तोही ऐसीचि वचने गाये । परी अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ।।५५।। हां गा अंधळ्यांचां गांवीं । आपणपें प्रगटले रवि । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ।।५६।। ए-हवीं देवर्षिही अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसी जे मधुरता तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांही ।।५७।। पैं असिता देवलाचेनहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परी तैं बुद्धी विषयविखें । घारिली होती ।।५८।। विषयविषाचा पडिपाडु । गोड परमार्थु लागे कडु । कडु विषय तो गोडु । जीवासि जाहला ।।५९।। आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदां सांगिजे ।।१६०।। परी तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेविं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणोनि ।।६१।। तैसीं व्यासादिकांची बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी । परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा ।।६२।।
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: ।।१४।।
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवेयांचेंचि फिटलें । अनोळखपण ।।६३।। जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माझिये हृदयभूमिके पडिले सखोल । वरी इये कृपेची जाहली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ।।६४।। अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरिता । मी महोदधी जालों अनंता । संवादसुखाचा ।।६५।। प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें । तयांची न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ।।६६।। ये-हवी वडीलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें । परी कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेंचि कांहीं ।।६७।। म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ।।६८।। जी बनकरू झाडेंसी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी । परी फळेंसीं तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ।।६९।। अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडें । पैं रसायने तैं गोडें । जेव्हां आरोग्य देहीं ।।१७०।। कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण । जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ।।७१।। तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जैं अभ्यासिलें । तें तैंचि म्हणो ये आपुलें । जैं सानुकूळ गुरू ।।७२।। ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचीं नाचतुसे भोंजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ।।७३।। तरी साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तूं देवां देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ।।७४।। तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । आपुलिया जाणे जाणिवा । तैंसा कहींचि नाही हें सद्भावा । भरंवसेनि आलें ।।७५।।
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।।१५।।
एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें । कां मी येतुली घनवट ऐेसें । पृथ्वीचि जाणे ।।७६।। तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वायां ।।७७।। हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं ।।७८।। तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकते नोहे । आतां तुझे ज्ञान होये । तुजचि जोगें ।।७९।। जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकांतें सांगावयाही तू समर्थ होसी । तरी आतां एकवेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ।।१८०।। हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभूवनगजपंचानना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ।।८१।। जरी थोरी तुझी पाहत आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों । या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ।।८२।। भरले सरिता समुद्र चहूंकडे । परी तें बापियासि कोरडें । कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया ।।८३।। तैसें गुरू जी सर्वत्र आथि । परी कृष्णा आम्हां तूंचि गती । हे असो मजप्रती । विभूति सांगें ।।८४।।
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतय: ।
याभिर्विभूतिभिर्लाेकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ।।१६।।
जी तुझिया विभूती आघविया । परी व्यापिती या शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ।।८५।। जिहीं विभूति ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करी ।।८६।।
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ।।१७।।
जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदां चिंतावेें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरी चिंतनचि न घडे ।।८७।। म्हणोनि मागां भाव जैसें । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसें । एकवेळ । बोलें ।।८८।। जया जया भावांचां ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवळ करूनि देर्इं । योगु आपुला ।।८९।।
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूय: कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ।।१८।।
आणि पुसलिया जिया विभूति । त्याही बोलाविया भूपती । एथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ।।१९०।। तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवें जी ।।९१।। जें काळकुटाचें सहोदर । हें मृत्युभेणें प्याले अमर । तरी दिहाचे पुरंदर । चौदा जाती ।।९२।। ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मिठांशु । जे पुरे म्हणों नेदी ।।९३।। तया पाबळेयाहि येतुलेवरी । गोडियेची आथि थोरी । मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ।।९४।। जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरू न डहुळितां । अनादि स्वभावता । आइतें आहे ।।९५।। जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ।।९६।। जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ।।९७।। जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय नि:शेख । आंत बाहेरि महासुख । वाढोंचि लागे ।।९८।। मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरे म्हणों न शके ।।९९।। तंव तुझे नामचि जी आम्हां आवडे । वरी भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरंवाडें । आनंदाचेनी ।।२००।। आतां हे सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरी येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ।।१।। हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा । कां नित्य वाहतया गंगाजळा । पारसेंपण असे ।।२।। तुवां स्वमुखें जें बोलिलें । हें आम्ही नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां ।।३।। तया पार्थाचिया बोला । सर्वांगें श्रीकृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ।।४।। ऐसा पतिकराचिया तोषाआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु । तो सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ।।५।।
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय: ।
प्राधान्यत: कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ।।१९।।
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवें चित्ता । कीं म्हणतसे बा पांडुसुता । भलें केलें ।।६।। अर्जुनातें बा म्हणे एथकांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । अंगें तो लेकरूं काई । नव्हेचि नंदाचें ।।७।। परी प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ।।८।। तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परी माझिये मती । आकळती ना ।।९।। अंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ।।२१०।। ए-हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें ।।११।। जिया जाणितलियासाठीं । आघविया जाणितलिया किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरुचि आला होय ।।१२।। कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडतीं फळें फुलें । तेविं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ।।१३।। ए-हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।।१४।।
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित: ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ।।२०।।
आइकें कुटिलालकमस्तका । धर्नुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैकां । भूतमात्राचां ठायीं ।।१५।। आंतुलीकडे मीचि यांचां अंत:करणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ।।१६।। जैसें मेघां या तळीवरीं । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जालें । अवधारीं । असणेंही आकाशीं ।।१७।। पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेविं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ।।१८।। ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतीयोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ।।१९।। याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रति । सांगेन म्हणितलें तुजप्रीती । त्या प्रधाना आइकें ।।२२०।।
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ।।२१।।
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणें विष्णु मी आदित्यांआंतु । रवि मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ।।२१।। मरुद्गणांचां वर्गीं । मरीचि म्हणे मी शारंगी । चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं ।।२२।।
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासव: ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ।।२२।।
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजीं मरुद्बंधु । महेंद्र तो मी ।।२३।। इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ।।२४।।
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरु: शिखरिणामहम ।।२३।।
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ।।२५।। यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ।।२६।। मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।।२७।।
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्द: सरसामस्मि सागर: ।।२४।।
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय: ।।२५।।
जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदिचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ।।२८।। त्रिभुवनींचिया सेनापती- । आंत स्कंधु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकांतु जाहला ।।२९।। सकळिकां सरोसरांसी । माझारि समुद्र तो मी जळराशी । महर्षीआंतु तपोराशी । भृगु तो मी ।।२३०।। अशेषांही वाचा- । आंतु नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठीचा । वेल्हाळु म्हणे ।।३१।। समस्तांही यज्ञांचां पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ।।३२।। नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ।।३३।। स्थावरां गिरीवरांआंतु । पुण्यपूज्य जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मीयेचा ।।३४।।
अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद: ।
गन्धर्वाणां चित्ररथ: सिद्धानां कपिलो मुनि: ।।२६।।
उच्चै:श्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ।।२७।।
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरी ययां वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ।।३५।। देवऋषीआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वा । सकळिकांमाजीं ।।३६।। ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उच्चै:श्रवा मी ।।३७।। राज्यभूषणां गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशि सुरमथितु । अमृतांशु तो मी ।।३८।। ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ।।३९।।
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्प: सर्पाणामस्मि वासुकि: ।।२८।।
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यम: संयमतामहम् ।।२९।।
पैं आघवेया हातियेरां- । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ।।२४०।। धेनूंमध्यें कामधेनु । ते मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयां आंत मदनु । तो मी जाणें ।।४१।। सर्पकुळाआंतु अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ।।४२।। अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ।।४३।। आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वतां । बोलत आहें ।।४४।। जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांचिया मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ।।४५।। तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ।।४६।।
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ।।३०।।
अगा दैत्यांचिया कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं । म्हणोनि दैत्यभावादि मेळीं । लिंपेचिना ।।४७।। पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांआंतु शार्दुळु । तो मी जाण ।।४८।। पक्षिजातीमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ।।४९।।
पवन: पवतामस्मि राम: शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाङ्घवी ।।३१।।
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडी न लगतां धनुर्धरा । एकेंचि उड्डाणें सातांही सागरां । प्रदक्षिणा करी जो ।।२५०।। तयां वहिलियां गतिमंतां- । आंतु पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजी श्रीराम तो मी ।।५१।। जेणें सांकडलिया धर्माचेनि कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ।।५२।। पाठीं उभें ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधलीं भूतां ।।५३।। जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ।।५४।। तो हतियेरुपरजितयांआंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ।।५५।। पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जङ्घूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ।।५६।। ते त्रिभुवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ।।५७।। ऐसेनि वेगळालां सृष्टिपैकीं । विभूती नाम सुतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोंकी । अर्घ्या नव्हती ।।५८।।
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वाद: प्रवदतामहम् ।।३२।।
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्व: सामासिकस्य च ।
अहमेवाक्षय: कालो धाताहं विश्वतोमुख: ।।३३।।
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ।।५९।। कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरी भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पाहावा । तरी जाणावें मातें ।।२६०।। जैसें शाखांसी फूल फळ । एकीहेळा वेटाळूं म्हणिजे सकळ । तरी उपडूनियां मूळ । जेविं हातीं घेपे ।।६१।। तेविं माझे विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ।।६२।। ए-हवीं वेगळालिया विभूती । कायि एक परिससी किती । म्हणोनि एकीहेळां महामती । सर्व मी जाण ।।६३।। मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेविं ।।६४।। ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परी हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ।।६५।। कां जे तुवां पुसलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ।।६६।। अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकळशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ।।६७।। जो निर्वचूं जातां वाढे । आइकिलियां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होती ।।६८।। ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांआंतु विशदु । अकारू तो मी ।।६९।। पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ।।२७०।। मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ।।७१।। जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरिटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ।।७२।। ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ।।७३।।
मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा ।।३४।।
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ।।७४।। आतां स्त्रीगणांचां पैंकी । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ।।७५।। तरी निच नवी जे किर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसीं जे संपत्ती । तेही मीचि जाणें ।।७६।। आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचां । आरूढोनि विवेकाचां । मार्गीं चाले ।।७७।। देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही पै एथें । त्रिशुद्धी मी ।।७८।। पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ।।७९।। एवं नारीमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ।।२८०।।
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: ।।३५।।
वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ।।८१।। गायत्रीछंद जे म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ।।८२।। मासांआंत मार्गशिरु । तो मी म्हणे शारंगधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ।।८३।।
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ।।३६।।
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजय: ।
मुनीनामप्यहं व्यास: कवीनामुशना कवि: ।।३७।।
छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणोनि चोहटा चोरी परी कवणा । निवारूं न ये ।।८४।। अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ।।८५।। जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझेंचि स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ।।८६।। सत्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजी श्रीमंतु । तोचि तो मी ।।८७।। जो देवकी वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ।।८८।। नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मिया अदानवी सृष्टि केली । करी गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ।।८९।। कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ।।२९०।। प्रथम दशेचिये पहांटे-। माजी कंसाऐसीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ।।९१।। हें काय किती एक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरी यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ।।९२।। आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ।।९३।। संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । त-हीं विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ।।९४।। मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य मी ।।९५।।
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ।।३८।।
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ।।९६।। पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळ शास्त्रांमाजीं यया । नीतिशास्त्र तें मी ।।९७।। आघवियाचि गूढां- । आंतु मौन तें मी सुहाडा । म्हणोनि न बोलतयां पुढां । स्रष्टाही नेण होय ।।९८।। अगा ज्ञानियांचां ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ।।९९।।
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ।।३९।।
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।।४०।।
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ।।३००।। पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेविं गा । तेविं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ।।१।। ऐशियाही सात पांच या प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ।।२।। येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणोनि परिससी तूं काई । आम्ही सांगों किती ।।३।। यालागि एकीहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज । सर्वभूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ।।४।। म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ।।५।। तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण । तरी अर्जुना तें तूं जाण । विभूती माझी ।।६।।
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ।।४१।।
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ।।७।।
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।।४२।।
अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेविं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ।।८।। तयांतें एकलें झणीं म्हण । तो निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ।९।। तियेतें जें जेधवां जो मागे । ते ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेविं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ।।३१०।। तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ।।११।। आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ।।१२।। तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैंसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ।।१३।। ए-हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें । हां गा वायूसि काय डावें । उजवे अंग आहे ।।१४।। पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहातां नासेल आपुली दिठी । तेविं माझां स्वरूपीं गोठीं । सामान्यविशेषाची नाहीं ।।१५।। आणि सिनाना विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असों हे जाणणें ।।१६।। आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ।।१७।। ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ।।१८।। तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हे राभस्य बोलिलेती तुम्हीं । जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं ।।१९।। हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । केवी धसाळ म्हणों देवा तूंते । तरी अधिक हा बोलु ।।३२०।। तुझें नांवचि एक कोण्ही वेळें । जयांचिये मुखासि कां काना मिळे । तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ।।२१।। तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ।।२२।। जी चंद्रबिंबाचां गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारंगधरा । बोला हें तुम्ही ।।२३।। तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ।।२४।। आम्ही तुज भेदाचिया वाहाणी । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंत:करणीं । मानिली कीं न मने ।।२५।। हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ।।२६।। येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ।।२७।। पैं राया तो पंडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ।।२८।। कीं संजयो दुखवलेनि अंत:करणें । म्हणतसे नवल नव्हे दैवा दवडणें । हा जीवें धडसा आहे मी म्हणे । तंव आंतुही आंधळा ।।२९।। परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवीतसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ।।३३०।। म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरि अवतरों कां डोळ्यांप्रति । इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ।।३१।। मियां इहींच दोंहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो दैवा आगळा । म्हणऊनि करी ।।३२।। आजि तो कल्पतरुची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साच करीतसे येरु ।।३३।। जो प्रल्हादाचिया बोला । विषाही सकट आपण जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसीं ।।३४।। म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ।।३३५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्याय: ।।१०।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहावा समाप्त ।। (श्लोक ४२, ओव्या ३३५)
।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।