संपादक : आचार्य विराज शांताराम
अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।१।।
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंत:करणें । विचारूं ये ।।१।। मागां सकळ कर्माचा संन्यासु। तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु। तरी कर्मयोगी केविं अतिरसु । पोखीतसां पुढती ।।२।। ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हा नेणतयांचिया चित्ता। आपुलिये चाडे अनंता । उमजु नोहे ।।३।। ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ।।४।। तरी याचिलागी तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जे हा परमार्थु ध्वनितें न बोलावा ।।५।। परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगें दोहींमाजीं बरवा । मार्गु कवण ।।६।। जो परिणामीचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ।।७।। जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोकासना सांगडें । सोहपें होय ।।८।। येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ।।९।। देखा कामधेनुऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ।।१०।। पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्युचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ।।११।। तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । कां सर्वसुखांचा वसौटा । तोचि नोहावा ।।१२।। एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ।।१३।। म्हणोनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ।।१४।।
श्रीभगवानुवाच
संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।२।।
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोग विचारितां । मोक्षकर तत्त्वता । दोनीही होती ।।१५।। तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळां । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ।।१६।। तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ।।१७।। आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ।।१८।।
ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ।।३।।
तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरू जैसा ।।१९।। आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंत:करण। पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।।२०।। जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ।।२१।। आतां गृहादिक आघवें । तें कांही नलगे त्यजावें । जें घेतें जाहले स्वभावें । नि:संगु म्हणऊनि ।।२२।। देखें अग्नी विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ।।२३।। तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धि । संकल्पु नाहीं ।।२४।। म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ।।२५।।
सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता:।
एकमप्यास्थित: सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।४।।
ये-हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ।।२६।। सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न । ये-हवी दीपाप्रति काइ आनान । प्रकाशु आहाती ।।२७।। पैं सम्यक एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । दोन्हीतेंही ऐक्यभावें । मानिती गा ।।२८।।
यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।५।।
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहींतें सहजें । इयापरी ।।२९।। देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ।।३०।। तयासींचि जगीं पाहले । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ।।३१।।
संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।६।।
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा। वहिला पावे ।।३२।। येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परी प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ।।३३।।
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय:।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।७।।
जेणें भ्रांतींपासूनि हिरतलें। गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।।३४।। जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे । मग होय सिंधूचिएवढें । मिळे तेव्हां ।।३५।। तैसे संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ।।३६।। आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटले तया स्वभावें । आणि करी ज-ही आघवें । त-ही अकर्ता तो ।।३७।।
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्।
पश्यन् शृृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ।।८।।
प्रलपन् विसृजन् गृह्णन्नुन्मिषन् निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।९।।
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठउ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगें ।।३८।। ऐसें तनुत्यागेंविण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ।।३९।। ए-हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरीं । अशेषींही व्यापारीं । वर्ततु दिसे ।।४०।। तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परी तेथिंचा सर्वथा नोहे । नवल देखें ।।४१।। स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथि ।।४२।। आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ।।४३।। आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें। राहाटे कीर ।।४४।। हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष। आदिकरूनि ।।४५।। पार्था तयाचां ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं। परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ।।४६।। जैं भ्रांतिसेजे सुतला । तै स्वप्नसुखें भुतला । मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनियां ।।४७।।
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति य: ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।१०।।
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ।।४८।। दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसें । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ।।४९।। तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपें जळीं जळें । पद्मपत्र ।।५०।।
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिन: कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वाऽत्मशुद्धये ।।११।।
देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुरु नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ।।५१।। हेंचि मराठें परियेसीं । तरी बाळकाची चेष्टा जैसी । योगिये कर्में करिती तैसीं । केवळा तनु ।।५२।। मग पांचभौतिक संचले । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ।।५३।। नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदु:खें भोगी ।।५४।। इंद्रियांचां गांवी नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ।।५५।। योगिये तोही करिती । परी कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ।।५६।। आतां जाहलिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ।।५७।। स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ।।५८।। हें असो काजेंविण । जें जें कांही कारण ।। तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ।।५९।। मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धिचें कर्म निरुतें । ओळख अर्जुनातें । म्हणे श्रीहरी ।।६०।। ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी । परी ते नैष्कर्म्यापासूनि । मुक्त दिसती ।।६१।। जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तया अहंकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ।।६२।। अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म । हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ।।६३।। आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ।।६४।। एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ।।६५।। हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथालागु । होईल श्लोकसंगती भंगु । म्हणऊनियां ।।६६।। जे मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धि नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ।।६७।। जें शब्दातीत स्वभावें । तें बोलिंचि जरी फावें । तरी आणिकें काय करावें । सांगें कथा ।।६८।। हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दासु निवृत्तीचा । म्हणे संवादु तया दोघांचा । परिसोनि परिसा ।।६९।। मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देर्इं ।।७०।।
युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।
तरी आत्मयोगे आथिला । जो कर्मफळांशी विटला । तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।।७१।। येरु कर्मबंधें किरिटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाचां ।।७२।।
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।।१३।।
जैसा फळाचिये हांवें । ऐसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ।।७३।। तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।।७४।। नवद्वारें देहीं । तो असतुचि परी नाहीं । करितुचि न करी कांही । फळत्यागी ।।७५।।
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निव्र्यापारु। परी तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ।।७६।। आणि कर्ता ऐसें म्हणिपें । तरी कवणें कर्मीं न शिंपे । जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ।।७७।। योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भलें ।।७८।। जगाचां जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीही नेणे ।।७९।।
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।
अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ।।८०।। पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परी अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ।।८१।। तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ।।८२।।
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मन:।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचें ।।८३।। एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ।।८४।। ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासि भेदु कैंचा त्रिजगतीं । देखे आपुलिया प्रतीती । जगचि मुक्त ।।८५।। जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाचि सूर्यें दिवाळी । कीं येरींही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ।।८६।।
तद् बुद्धय स्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ।।८७ ।। ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें । तयांची समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ।।८८।। एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणे कायसें । नवलु एथ ।।८९।। परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखें । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ।।९०।। ना तरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ।।९१।। हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ।।९२।।
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ।।९३।। ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ।।९४।। एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषम काई ।।९५।।
इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ।।९६।। जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडिता । परी भोगिली नि:संगता । कामेेंविण ।।९७।। जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । पण सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ।।९८।। जैसा जनामाजीं खेंचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरीं तो परी संसारु । नोळखे तयांतें ।।९९।। हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें ।।१००।। तैसें नाम रूप तयाचें । ये-हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ।।१।। ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ।।२।।
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाऽप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।
तरी मृगजळाचेनि पुरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरें । पातलां जो ।।३।। तोचि तो निरुता । समदृष्टि तत्त्वता । हरी म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ।।४।।
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।२१।।
जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरि येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ।।५।। सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ।।६।। सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु कायि वाळुवंटे । चुंबितु आहे ।।७।। तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपांचि फावलें । तया विषय सहज सांडवलें । म्हणों काई ।।८।। ए-हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकवती कवण ।।९।।
ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।२२।।
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंक कां आळुकैलें । तुषांतें सेवी ।।११०।। नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळातें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ।।११।। तैसें आपणपें नाहीं दिठें । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ।।१२।। ए-हवीं विषयी काइ सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ।।१३।। सांगें वात वर्ष आतपु धरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ।।१४।। म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ।।१५।। ना तरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । वैषयिकु हा ।।१६।। हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ।।१७।। जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ।।१८।। हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी-। सारिखें दिसे ।।१९।। म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दु:ख । परी काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ।।१२०।। तें अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ।।२१।। तयां दु:खियां दु:खचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळातें जळचर । सांडिती केवीं ।।२२।। आणि दु:खयोनी जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ।।२३।। नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचें कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहवी कवणें ।।२४।। जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ।।२५।। म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविले । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदु:ख ।।२६।। याकारणे गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा। विसरोनि जाशी ।।२७।। पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जेैसें विष । निराशा तयां दु:ख । दाविलें नावडें ।।२८।।
शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।२३।।
ज्ञानियाचां हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ।।२९।। जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि नि:शेष । अंतरी सुख । एक आथि ।।१३०।। परी तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हें तेथ विसरिजे । भोगितेंपणही ।।३१।। भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंठी । गाढेंपणें ।।३२।। तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ।।३३।। कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैंसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ।।३४।। ऐशी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ।।३५।।
योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य:।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।२४।।
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।
छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।२५।।
म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणचि पावेल स्वभावें । आत्माराम ।।३६।। जे ऐसेनि सुखें मातले । आंपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ।।३७।। ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ।।३८।। ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।।३९।। ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ।।१४०।। तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनागर ।।४१।। परी तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ।।४२।। ऐसा गुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ।।४३।। अर्जुना अनंत सुखाचां डोहीं । एकसरां तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ।।४४।। अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तों देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ।।४५।। जें साचोकारें परम । ना तें अक्षर नि:सीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ।।४६।। जें महर्षीं वाटलें । विरक्तां भागा फिटलें । जे नि:संशया पिकलें । निरंतर ।।४७।।
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।२६।।
जिहीं विषयापासोनि हिरतलें । चित्त आपुले आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ।।४८।। तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ।।४९।। ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ।।१५०।।
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।२७।।
तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ।।५१।। सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवा पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पारुखोनियां ।।५२।। सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसी व्योम- । गामिये करिती ।।५३।।
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।
विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।२८।।
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळें । मग एकेक वेगळें । निवडूं नये ।।५४।। तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ।।५५।। जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ।।५६।। तैसें मनपण मुदल जाय । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।।५७।।
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।२९।।
आम्ही मागां हन सांगितलें । जें देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणऊनियां ।।५८।। आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हें पार । पातले ते ।।५९।। तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतले माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ।।१६०।। ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ।।६१।। तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाईलें । इये बोलीं तुझें ।।६२।। तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ।।६३।। म्यां जें कांही विवरूनि पुसावें । तें आधींचि कळिले देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ।।६४।। ये-हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्ही अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।।६५।। तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखिया अभोळां । एथ आहाति कांहीं परी काळा । तो साहों ये वर ।।६६।। म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ।।६७।। तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका । तरी काय जाहलें आइकीं जो कां । सुखे बोलों ।।६८।। अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वाणि कायसी । सांगावयाची ।।६९।। आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंतयाचे । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ।।१७०।। ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टी । कीं नवया स्नेहाची सृष्टी । हें असो नेणिजे दृृष्टी । हरीची वानूं ।।७१।। जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघो नेणें ।।७२।। हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परी तें स्नेहरूपा न येल । बोलवरी ।।७३।। म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु आकळावा कवणें । जो आपुलें मान नेणे । आपणचि ।।७४।। तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ।।७५।। अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ।।७६।। तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकार प्रसंगु । कवणा एथ ।।७७।। ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठार्इं । तें आघवेचि पाहीं । सांगेन आतां ।।७८।। तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ।।७९।। श्रीकृष्ण अर्जुनासीं संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ।।१८०।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्याय:।।५।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा समाप्त ।। (श्लोक २९, ओव्या १८०)
।। पुंडलिक वरदाऽ हरि विठ्ठऽल श्रीऽ ज्ञानदेव तुकाराम ।।
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।१।।
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंत:करणें । विचारूं ये ।।१।। मागां सकळ कर्माचा संन्यासु। तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु। तरी कर्मयोगी केविं अतिरसु । पोखीतसां पुढती ।।२।। ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हा नेणतयांचिया चित्ता। आपुलिये चाडे अनंता । उमजु नोहे ।।३।। ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ।।४।। तरी याचिलागी तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जे हा परमार्थु ध्वनितें न बोलावा ।।५।। परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगें दोहींमाजीं बरवा । मार्गु कवण ।।६।। जो परिणामीचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ।।७।। जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोकासना सांगडें । सोहपें होय ।।८।। येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ।।९।। देखा कामधेनुऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ।।१०।। पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्युचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ।।११।। तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । कां सर्वसुखांचा वसौटा । तोचि नोहावा ।।१२।। एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ।।१३।। म्हणोनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ।।१४।।
श्रीभगवानुवाच
संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।२।।
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोग विचारितां । मोक्षकर तत्त्वता । दोनीही होती ।।१५।। तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळां । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ।।१६।। तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ।।१७।। आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ।।१८।।
ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ।।३।।
तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरू जैसा ।।१९।। आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंत:करण। पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।।२०।। जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ।।२१।। आतां गृहादिक आघवें । तें कांही नलगे त्यजावें । जें घेतें जाहले स्वभावें । नि:संगु म्हणऊनि ।।२२।। देखें अग्नी विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ।।२३।। तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धि । संकल्पु नाहीं ।।२४।। म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ।।२५।।
सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता:।
एकमप्यास्थित: सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।४।।
ये-हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ।।२६।। सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न । ये-हवी दीपाप्रति काइ आनान । प्रकाशु आहाती ।।२७।। पैं सम्यक एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । दोन्हीतेंही ऐक्यभावें । मानिती गा ।।२८।।
यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।५।।
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहींतें सहजें । इयापरी ।।२९।। देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ।।३०।। तयासींचि जगीं पाहले । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ।।३१।।
संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।६।।
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा। वहिला पावे ।।३२।। येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परी प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ।।३३।।
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय:।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।७।।
जेणें भ्रांतींपासूनि हिरतलें। गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।।३४।। जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे । मग होय सिंधूचिएवढें । मिळे तेव्हां ।।३५।। तैसे संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ।।३६।। आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटले तया स्वभावें । आणि करी ज-ही आघवें । त-ही अकर्ता तो ।।३७।।
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्।
पश्यन् शृृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ।।८।।
प्रलपन् विसृजन् गृह्णन्नुन्मिषन् निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।९।।
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठउ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगें ।।३८।। ऐसें तनुत्यागेंविण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ।।३९।। ए-हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरीं । अशेषींही व्यापारीं । वर्ततु दिसे ।।४०।। तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परी तेथिंचा सर्वथा नोहे । नवल देखें ।।४१।। स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथि ।।४२।। आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ।।४३।। आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें। राहाटे कीर ।।४४।। हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष। आदिकरूनि ।।४५।। पार्था तयाचां ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं। परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ।।४६।। जैं भ्रांतिसेजे सुतला । तै स्वप्नसुखें भुतला । मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनियां ।।४७।।
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति य: ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।१०।।
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ।।४८।। दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसें । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ।।४९।। तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपें जळीं जळें । पद्मपत्र ।।५०।।
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिन: कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वाऽत्मशुद्धये ।।११।।
देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुरु नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ।।५१।। हेंचि मराठें परियेसीं । तरी बाळकाची चेष्टा जैसी । योगिये कर्में करिती तैसीं । केवळा तनु ।।५२।। मग पांचभौतिक संचले । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ।।५३।। नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदु:खें भोगी ।।५४।। इंद्रियांचां गांवी नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ।।५५।। योगिये तोही करिती । परी कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ।।५६।। आतां जाहलिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ।।५७।। स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ।।५८।। हें असो काजेंविण । जें जें कांही कारण ।। तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ।।५९।। मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धिचें कर्म निरुतें । ओळख अर्जुनातें । म्हणे श्रीहरी ।।६०।। ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी । परी ते नैष्कर्म्यापासूनि । मुक्त दिसती ।।६१।। जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तया अहंकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ।।६२।। अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म । हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ।।६३।। आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ।।६४।। एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ।।६५।। हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथालागु । होईल श्लोकसंगती भंगु । म्हणऊनियां ।।६६।। जे मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धि नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ।।६७।। जें शब्दातीत स्वभावें । तें बोलिंचि जरी फावें । तरी आणिकें काय करावें । सांगें कथा ।।६८।। हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दासु निवृत्तीचा । म्हणे संवादु तया दोघांचा । परिसोनि परिसा ।।६९।। मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देर्इं ।।७०।।
युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।
तरी आत्मयोगे आथिला । जो कर्मफळांशी विटला । तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।।७१।। येरु कर्मबंधें किरिटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाचां ।।७२।।
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।।१३।।
जैसा फळाचिये हांवें । ऐसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ।।७३।। तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।।७४।। नवद्वारें देहीं । तो असतुचि परी नाहीं । करितुचि न करी कांही । फळत्यागी ।।७५।।
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निव्र्यापारु। परी तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ।।७६।। आणि कर्ता ऐसें म्हणिपें । तरी कवणें कर्मीं न शिंपे । जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ।।७७।। योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भलें ।।७८।। जगाचां जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीही नेणे ।।७९।।
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।
अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ।।८०।। पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परी अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ।।८१।। तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ।।८२।।
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मन:।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचें ।।८३।। एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ।।८४।। ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासि भेदु कैंचा त्रिजगतीं । देखे आपुलिया प्रतीती । जगचि मुक्त ।।८५।। जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाचि सूर्यें दिवाळी । कीं येरींही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ।।८६।।
तद् बुद्धय स्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ।।८७ ।। ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें । तयांची समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ।।८८।। एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणे कायसें । नवलु एथ ।।८९।। परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखें । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ।।९०।। ना तरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ।।९१।। हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ।।९२।।
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ।।९३।। ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ।।९४।। एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषम काई ।।९५।।
इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ।।९६।। जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडिता । परी भोगिली नि:संगता । कामेेंविण ।।९७।। जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । पण सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ।।९८।। जैसा जनामाजीं खेंचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरीं तो परी संसारु । नोळखे तयांतें ।।९९।। हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें ।।१००।। तैसें नाम रूप तयाचें । ये-हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ।।१।। ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ।।२।।
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाऽप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।
तरी मृगजळाचेनि पुरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरें । पातलां जो ।।३।। तोचि तो निरुता । समदृष्टि तत्त्वता । हरी म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ।।४।।
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।२१।।
जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरि येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ।।५।। सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ।।६।। सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु कायि वाळुवंटे । चुंबितु आहे ।।७।। तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपांचि फावलें । तया विषय सहज सांडवलें । म्हणों काई ।।८।। ए-हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकवती कवण ।।९।।
ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।२२।।
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंक कां आळुकैलें । तुषांतें सेवी ।।११०।। नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळातें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ।।११।। तैसें आपणपें नाहीं दिठें । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ।।१२।। ए-हवीं विषयी काइ सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ।।१३।। सांगें वात वर्ष आतपु धरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ।।१४।। म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ।।१५।। ना तरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । वैषयिकु हा ।।१६।। हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ।।१७।। जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ।।१८।। हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी-। सारिखें दिसे ।।१९।। म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दु:ख । परी काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ।।१२०।। तें अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ।।२१।। तयां दु:खियां दु:खचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळातें जळचर । सांडिती केवीं ।।२२।। आणि दु:खयोनी जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ।।२३।। नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचें कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहवी कवणें ।।२४।। जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ।।२५।। म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविले । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदु:ख ।।२६।। याकारणे गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा। विसरोनि जाशी ।।२७।। पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जेैसें विष । निराशा तयां दु:ख । दाविलें नावडें ।।२८।।
शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।२३।।
ज्ञानियाचां हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ।।२९।। जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि नि:शेष । अंतरी सुख । एक आथि ।।१३०।। परी तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हें तेथ विसरिजे । भोगितेंपणही ।।३१।। भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंठी । गाढेंपणें ।।३२।। तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ।।३३।। कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैंसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ।।३४।। ऐशी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ।।३५।।
योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य:।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।२४।।
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।
छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।२५।।
म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणचि पावेल स्वभावें । आत्माराम ।।३६।। जे ऐसेनि सुखें मातले । आंपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ।।३७।। ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ।।३८।। ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।।३९।। ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ।।१४०।। तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनागर ।।४१।। परी तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ।।४२।। ऐसा गुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ।।४३।। अर्जुना अनंत सुखाचां डोहीं । एकसरां तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ।।४४।। अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तों देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ।।४५।। जें साचोकारें परम । ना तें अक्षर नि:सीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ।।४६।। जें महर्षीं वाटलें । विरक्तां भागा फिटलें । जे नि:संशया पिकलें । निरंतर ।।४७।।
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।२६।।
जिहीं विषयापासोनि हिरतलें । चित्त आपुले आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ।।४८।। तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ।।४९।। ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ।।१५०।।
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।२७।।
तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ।।५१।। सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवा पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पारुखोनियां ।।५२।। सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसी व्योम- । गामिये करिती ।।५३।।
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।
विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।२८।।
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळें । मग एकेक वेगळें । निवडूं नये ।।५४।। तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ।।५५।। जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ।।५६।। तैसें मनपण मुदल जाय । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।।५७।।
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।२९।।
आम्ही मागां हन सांगितलें । जें देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणऊनियां ।।५८।। आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हें पार । पातले ते ।।५९।। तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतले माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ।।१६०।। ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ।।६१।। तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाईलें । इये बोलीं तुझें ।।६२।। तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ।।६३।। म्यां जें कांही विवरूनि पुसावें । तें आधींचि कळिले देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ।।६४।। ये-हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्ही अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।।६५।। तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखिया अभोळां । एथ आहाति कांहीं परी काळा । तो साहों ये वर ।।६६।। म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ।।६७।। तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका । तरी काय जाहलें आइकीं जो कां । सुखे बोलों ।।६८।। अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वाणि कायसी । सांगावयाची ।।६९।। आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंतयाचे । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ।।१७०।। ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टी । कीं नवया स्नेहाची सृष्टी । हें असो नेणिजे दृृष्टी । हरीची वानूं ।।७१।। जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघो नेणें ।।७२।। हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परी तें स्नेहरूपा न येल । बोलवरी ।।७३।। म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु आकळावा कवणें । जो आपुलें मान नेणे । आपणचि ।।७४।। तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ।।७५।। अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ।।७६।। तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकार प्रसंगु । कवणा एथ ।।७७।। ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठार्इं । तें आघवेचि पाहीं । सांगेन आतां ।।७८।। तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ।।७९।। श्रीकृष्ण अर्जुनासीं संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ।।१८०।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्याय:।।५।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा समाप्त ।। (श्लोक २९, ओव्या १८०)
।। पुंडलिक वरदाऽ हरि विठ्ठऽल श्रीऽ ज्ञानदेव तुकाराम ।।