संपादक : आचार्य विराज शांताराम
आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ।।१।। आधींची विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरिटी । परिसत असे ।।२।। जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ।।३।। कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आलीं ।।४।। आता इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ।।५।। हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनी कथाची ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ।।६।। ते वेळी संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीती नारायणे । बोलिजतु असे ।।७।। जें न संगेची पितया वसुदेवासी । जे न संगेची माते देवकीसी । जे न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ।।८।। देवी लक्ष्मीये एवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचे पिक । यातेंचि आथि ।।९।। सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतीया कीर बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ।।१०।। या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ।।११।। हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ।।१२।। ए-हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ।।१३।। तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ।।१४।। हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ।।१५।।
श्रीभगवानुवाच :
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।१।।
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ।।१६।। मग तेणें विवस्वतें रवीं । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनुप्रति ।।१७।। मनुनें आपणे अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ।।१८।।
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: ।
स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ।।२।।
मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनी आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ।।१९।। जें प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ।।२०।। अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ।।२१।। येरवीं तरी खवणेंयाचां गांवीं । पाटाउवें काय करावीं । सांगें जात्यंधा रवी । काय आथि ।।२२।। कां बहिरयांचां आस्थानीं । कवण गीतातें मानी । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे ।।२३।। पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केविं चंद्रातें । वोळखती ।।२४।। तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती । ते मूर्ख केविं पावती । मज ईश्वरातें ।।२५।। कैसा नेणों मोहो वाढिन्नला । तेणे बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ।।२६।।
स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन: ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ।।३।।
तोचि हा आजीं आतां । तुजप्रति कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करी ।।२७।। हें जीवींचें निज गुज । परी केविं राखों तुज । जें पढियेंसी तूं मज । म्हणऊनियां ।।२८।। तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ।।२९।। तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी संग्रामारूढ आहों । जाहालों आम्ही ।।३०।। तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ।।३१।।
अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत: ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ।।४।।
तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । तेथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ।।३२।। तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ।।३३।। देवा पांगुळ एकाधें विइजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ।।३४।। आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देर्इं । तेवींचि देवें कोंपावें ना काही । बोला एका ।।३५।। तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ।। ३६।। जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं । तरी तुवांचि केविं पाहीं । उपदेशिला ।।३७।। तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ।।३८।। तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे । हें लटिकें केविं म्हणिजे । एकिहेळां ।।३९।। परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैसी सांगावी । जें तुवांचि तया रवी केवी । उपदेशु केला ।।४०।।
श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ।।५।।
तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ।।४१।। तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी । बहुतें गेलीं परी तिये न स्मरसी । आपुलीं तूं ।।४२।। मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ।।४३।।
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ।।६।।
म्हणोनि आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परी संभवें । प्रकृतियोगें ।।४४।। माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ।।४५।। माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । ये-हवीं नाहीं ।।४६।। कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । ये-हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ।।४७।। तैसा अमूर्तचि मी किरिटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ।।४८।।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमर्धस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।७।।
जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ।।४९।। म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ।।५०।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।८।।
ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारू होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ।।५१।। अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ।।५२।। दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं । धर्माशीं नीतीसीं । शेंज भरीं ।।५३।। मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।५४।। स्वसुखें विश्व कोंदें । धर्मचि जगीं नांदें । भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ।।५५।। तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ।।५६।। ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परी हेंचि ओळखे जो जगीं । तो विवेकिया ।।५७।।
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।।९।।
माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ।।५८।। तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ।।५९।।
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता: ।।१०।।
ये-हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ।।६०।। जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कां आत्मबोधें तोषले । वीतराग जे ।।६१।। जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ।।६२।। ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । पदर नाहीं ।।६३।। सांगें पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय नि:शेख । तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाइजे ।।६४।। तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ।।६५।।
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।११।।
ये-हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठायीं । भजती तयां मीही । तैसाचि भजें ।।६६।। देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।।६७।। परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ।।६८।। म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती । देवो देवो म्हणती । अचर्चातें ।।६९।। जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ।।७०।।
कांक्षन्त: कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता: ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ।।१२।।
मग नानाहेतुप्रकारें । यथोचित उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ।।७१।। तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ निश्चित । ओळख तूं ।।७२।। वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।।७३।। जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ।।७४।। ना तरी कडेया तळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरिटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ।।७५।। तैसा समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ।।७६।।
चातुवर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।१३।।
आतां याचिपरी जाण । चाऱ्ही आहेती हे वर्ण । सृजिलें म्यां गुण-। कर्मभागें ।।७७।। जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ।।७८।। एथ एकचि हें धनुष्यपाणि । परी जाहालें गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ।।७९।। म्हणोनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ।।८०।।
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ।।१४।।
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।।८१।।
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभि: ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै: पूर्वतरं कृतम् ।।१५।।
मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐसियाचि जाणोनि मातें । कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ।।८२।। परी तें बीजें जैसी दग्धलीं । नुगवतीचि पेरिलीं । तैसीं कर्मेंचि परी तयां जाहलीं । मोक्षहेतु ।।८३।। एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे ।।८४।।
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।१६।।
कर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ।।८५।। जैसें कां कुडें नाणें । ख-याचेनि सारखेंपणें । डोळ्यांचेंही देखणें । संशयीं घालीं ।।८६।। तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहातीं कर्में । जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं सकती ।।८७।। वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ।।८८।।
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ।।१७।।
तरी कर्म म्हणिजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक् आधीं जाणावें । लागे एथ ।।८९।। मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही ओळखावें निश्चित । उपयोगेंसीं ।।९०।। पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि येथ कांहीं न गुंफे । आपैसेंचि ।।९१।। ये-हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ।।९२।।
कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ।।१८।।
जो सकळकर्मीं वर्ततां । देखें आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ।।९३।। आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ।।९४।। परी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इही चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ।।९५।। जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजीं देखे । तरी तो निभ्रांत ओळखे । म्हणे मी वेगळा आहें ।।९६।। अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जाता देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।।९७।। तैसें कर्म कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ।।९८।। आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मींचि असतां ।।९९।। तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळी जळामाजींं न बुडे । भानुबिंब ।।१००।। तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ।।१।। एकेंचि ठायीं बैसला । परी सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । अंगेंचि तो ।।२।।
यस्य सर्वे समारम्भा: कामसंकल्पवर्जिता: ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा: ।।१९।।
जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ।।३।। आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धि नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळे ना ।।४।। ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ।।५।।
त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रय: ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति स: ।।२०।।
जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ।।६।। जो संतोषाचां गाभारा । आत्मबोधाचिया वोगरा । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगिता ।।७।।
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह: ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।२१।।
यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सर: ।
सम: सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ।।२२।।
कैसी आधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेसीं ।।८।। म्हणोनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे । जया आपुलें आणि परावें । दोन्हीं नाहीं ।।९।। तो दिठी जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आइके तें आहे । तोचि जाहाला ।।११०।। चरणी हन चालें । मुखें जें जें बोले । ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ।।११।। हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ।।१२।। हा मत्सरू जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ।।१३।। म्हणोनि सर्वांपरि मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परी गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ।।१४।।
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस: ।
यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ।।२३।।
तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ।।१५।। ऐसाही परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें । तरी तियें लया जातीं अशेखें । तयाचांचि ठायीं ।।१६।। अकाळींची अभ्रें जैशीं । ऊर्मींवीण आकाशीं । हारपतीं आपैसीं । उदयलीं सांतीं ।।१७।। तैसीं विधीविधान विहितें । जरी आचरे तो समस्यें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ।।१८।।
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।२४।।
जें हें हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता । ऐसिया बुद्धिसि नाहीं भंगता । म्हणऊनियां ।।१९।। जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ।।१२०।। म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।।२१।। आतां अविवेक कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ।।२२।।
दैवमेवापरे यज्ञं योगिन: पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ।।२५।।
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ।।२३।। तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ।।२४।। दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्चयो परिणपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण । दैवयोगें ।।२५।। आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांतें यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे ।।२६।।
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ।।२६।।
एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ।।२७।। एकां वैराग्य रवि विवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ।।२८।। तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ।।२९।। मग वाक्यविधीचिया निरवडी। विषय आहुती उदंडीं । हवन केलें कुंडीं । इंद्रियाग्नीचां ।।१३०।।
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ।।२७।।
एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ।।३१।। तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ।।३२।। ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जें उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ।।३३।। पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ।।३४।। तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ।।३५।। तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसी नानाविधा । जाळिलिया ।।३६।। तेथ सोऽहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती । तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ।।३७।। पाठीं प्राणक्रियेचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहूती पडलिया हुताशीं । तेथ अवभृथ समरसी । सहजें जाहलें ।।३८।। मग आत्मबोधिचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ।।३९।। एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परी प्राप्य तें एक ।।१४०।।
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय: संशितवता: ।।२८।।
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ।।४१।। एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ।।४२।। हें अर्जुना सकळ कुवाडें । जें अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ।।४३।। ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले । म्हणोनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ।।४४।।
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणा: ।।२९।।
मग अपानाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ।।४५।। एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ।।४६।।
अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ।।३०।।
एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ।।४७।। ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ।।४८।। जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता । जेथ अग्नी आणि होता । उरेचिना ।।४९।। जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुतें जेथोनि वोसरे । क्रियाजात ।।१५०।। विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । लिंपेचिना ।।५१।।
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्य: कुरुसत्तम ।।३१।।
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ।।५२।। ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ।।५३।। येरां विरक्ति माळ न घालिचि । जयां संयामाग्नीची सेवा न घडेचि । जे योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ।।५४।। जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुसशी काई । म्हणोनि सांगो का वाई । पंडुकुमरा ।।५५।।
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ।।३२।।
ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ।।५६।। परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ।।५७।।
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञ: परंतप ।
सर्वंकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ।।३३।।
अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ।।५८।। ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैसी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ।।५९।। देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ।।१६०।। जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ।।६१।। जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ।।६२।। मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें । जयामाजीं सांपडलें । ज्ञेय दिसे ।।६३।। जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ।।६४।।
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ।।३४।।
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां या भजावें । सर्वस्वेंसीं ।।६५।। जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।।६६।। तरी तनुमनुजीवें । चरणासीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ।।६७।। मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणें अंत:करण बोधलें । संकल्पा नये ।।६८।।
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ।।३५।।
जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । नि:शंकु होय ।।६९।। ते वेळी आपणपेंया सहितें । इयें अशेषेंहि भूतें । माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ।।१७०।। ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ।।७१।।
अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ।।३६।।
जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ।।७२।। त-ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ।।७३।। देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ।।७४।। तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ । नाहीं येणें पाडें ढिसाळ । दुजें जगीं ।।७५।।
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।।३७।।
सांगें भुवनत्रयांची काजळी । जे गगनामाजीं उधवली । तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ।।७६।। कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे । तो प्रलयानळु दडपे । तृणें काष्ठें काई ।।७७।।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ।।३८।।
म्हणोनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ।।७८।। एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ।।७९।। या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ।।१८०।। ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ।।८१।। म्हणूनि बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धारितां । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ।।८२।। जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताची सारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ।।८३।। आतां यावरी जें बोलणें । तें वायांचि वेळु फेडणें । तंव सांचचि जी हें पार्थु म्हणे । जें बोलत असां ।।८४।। परी तेंचि ज्ञान केविं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें । तंव तें मनोगत देवें । जाणीतलें ।।८५।। मग म्हणतसे किरिटी । आतां चित्त देर्इं इये गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ।।८६।।
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ।।३९।।
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ।।८७।। जो मनासीं चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ।।८८।। तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावें निश्चित । जयामाजीं अचुंबित । शांति असे ।।८९।। तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।१९०।। मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे । तेथ आपारा पारु नेणिजे । निर्धारितां ।।९१।। ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगतां असे अपारु । परी असो आतां ।।९२।।
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।।४०।।
ऐकें जया प्राणियांचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ।।९३।। शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ।।९४।। अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ।।९५।। वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ।।९६।। जे अमृतही परी नावडे । ऐसें सावियाचि अरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों ये कीं ।।९७।। तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशयें अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ।।९८।। मग संशयीं जरी पडला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिक परत्रा मुकला । सुखासि गा ।।९९।। जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शितोष्णें जैशीं नेणें । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ।।२००।। तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयी तो नोळखे । हिताहित ।।१।। हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ।।२।। म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।।३।। येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा -। माजीं असे ।।४।। जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ।।५।। हदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होय । लोकत्रय ।।६।।
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।।४१।।
ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ।।७।। तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग नि:शेष खता फिटे । मानसींचा ।।८।।
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मन: ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।४२।।
या कारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ।।९।। ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्णु ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ।।२१०।। तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ।।११।। ते कथेची संगती । भावाची संपत्ती । रसाची उन्नती । म्हणिपेल पुढां ।।१२।। जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओंवाळणी । जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ।।१३।। तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ।।१४।। जैसें बिंब तरी बचकें एवढें । परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ।।१५।। नातरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ।।१६।। हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंति माझी ।।१७।। जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ।।१८।। आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावां ।।१९।। सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ।।२२०।। तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेविंचि कानाकरवीं म्हणवी । बापु माझा ।।२१।। तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । आणि संसारदु:ख मूळवणें । विकृतीविणें ।।२२।। जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायांचि का बांधावीं कटारें । रोग जाय दुधें साखरें । तरी निंब कां पियावा ।।२३।। तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दु:ख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजीं ।।२४।। म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ।।२२५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय: ।।४।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा समाप्त ।। (श्लोक ४२, ओव्या २२५)
।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।
श्रीभगवानुवाच :
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।१।।
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ।।१६।। मग तेणें विवस्वतें रवीं । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनुप्रति ।।१७।। मनुनें आपणे अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ।।१८।।
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: ।
स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ।।२।।
मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनी आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ।।१९।। जें प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ।।२०।। अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ।।२१।। येरवीं तरी खवणेंयाचां गांवीं । पाटाउवें काय करावीं । सांगें जात्यंधा रवी । काय आथि ।।२२।। कां बहिरयांचां आस्थानीं । कवण गीतातें मानी । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे ।।२३।। पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केविं चंद्रातें । वोळखती ।।२४।। तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती । ते मूर्ख केविं पावती । मज ईश्वरातें ।।२५।। कैसा नेणों मोहो वाढिन्नला । तेणे बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ।।२६।।
स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन: ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ।।३।।
तोचि हा आजीं आतां । तुजप्रति कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करी ।।२७।। हें जीवींचें निज गुज । परी केविं राखों तुज । जें पढियेंसी तूं मज । म्हणऊनियां ।।२८।। तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ।।२९।। तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी संग्रामारूढ आहों । जाहालों आम्ही ।।३०।। तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ।।३१।।
अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत: ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ।।४।।
तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । तेथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ।।३२।। तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ।।३३।। देवा पांगुळ एकाधें विइजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ।।३४।। आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देर्इं । तेवींचि देवें कोंपावें ना काही । बोला एका ।।३५।। तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ।। ३६।। जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं । तरी तुवांचि केविं पाहीं । उपदेशिला ।।३७।। तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ।।३८।। तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे । हें लटिकें केविं म्हणिजे । एकिहेळां ।।३९।। परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैसी सांगावी । जें तुवांचि तया रवी केवी । उपदेशु केला ।।४०।।
श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ।।५।।
तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ।।४१।। तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी । बहुतें गेलीं परी तिये न स्मरसी । आपुलीं तूं ।।४२।। मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ।।४३।।
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ।।६।।
म्हणोनि आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परी संभवें । प्रकृतियोगें ।।४४।। माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ।।४५।। माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । ये-हवीं नाहीं ।।४६।। कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । ये-हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ।।४७।। तैसा अमूर्तचि मी किरिटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ।।४८।।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमर्धस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।७।।
जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ।।४९।। म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ।।५०।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।८।।
ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारू होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ।।५१।। अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ।।५२।। दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं । धर्माशीं नीतीसीं । शेंज भरीं ।।५३।। मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।५४।। स्वसुखें विश्व कोंदें । धर्मचि जगीं नांदें । भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ।।५५।। तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ।।५६।। ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परी हेंचि ओळखे जो जगीं । तो विवेकिया ।।५७।।
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।।९।।
माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ।।५८।। तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ।।५९।।
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता: ।।१०।।
ये-हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ।।६०।। जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कां आत्मबोधें तोषले । वीतराग जे ।।६१।। जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ।।६२।। ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । पदर नाहीं ।।६३।। सांगें पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय नि:शेख । तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाइजे ।।६४।। तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ।।६५।।
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।११।।
ये-हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठायीं । भजती तयां मीही । तैसाचि भजें ।।६६।। देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।।६७।। परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ।।६८।। म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती । देवो देवो म्हणती । अचर्चातें ।।६९।। जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ।।७०।।
कांक्षन्त: कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता: ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ।।१२।।
मग नानाहेतुप्रकारें । यथोचित उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ।।७१।। तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ निश्चित । ओळख तूं ।।७२।। वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।।७३।। जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ।।७४।। ना तरी कडेया तळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरिटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ।।७५।। तैसा समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ।।७६।।
चातुवर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।१३।।
आतां याचिपरी जाण । चाऱ्ही आहेती हे वर्ण । सृजिलें म्यां गुण-। कर्मभागें ।।७७।। जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ।।७८।। एथ एकचि हें धनुष्यपाणि । परी जाहालें गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ।।७९।। म्हणोनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ।।८०।।
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ।।१४।।
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।।८१।।
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभि: ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै: पूर्वतरं कृतम् ।।१५।।
मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐसियाचि जाणोनि मातें । कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ।।८२।। परी तें बीजें जैसी दग्धलीं । नुगवतीचि पेरिलीं । तैसीं कर्मेंचि परी तयां जाहलीं । मोक्षहेतु ।।८३।। एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे ।।८४।।
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।१६।।
कर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ।।८५।। जैसें कां कुडें नाणें । ख-याचेनि सारखेंपणें । डोळ्यांचेंही देखणें । संशयीं घालीं ।।८६।। तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहातीं कर्में । जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं सकती ।।८७।। वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ।।८८।।
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ।।१७।।
तरी कर्म म्हणिजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक् आधीं जाणावें । लागे एथ ।।८९।। मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही ओळखावें निश्चित । उपयोगेंसीं ।।९०।। पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि येथ कांहीं न गुंफे । आपैसेंचि ।।९१।। ये-हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ।।९२।।
कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ।।१८।।
जो सकळकर्मीं वर्ततां । देखें आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ।।९३।। आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ।।९४।। परी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इही चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ।।९५।। जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजीं देखे । तरी तो निभ्रांत ओळखे । म्हणे मी वेगळा आहें ।।९६।। अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जाता देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।।९७।। तैसें कर्म कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ।।९८।। आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मींचि असतां ।।९९।। तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळी जळामाजींं न बुडे । भानुबिंब ।।१००।। तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ।।१।। एकेंचि ठायीं बैसला । परी सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । अंगेंचि तो ।।२।।
यस्य सर्वे समारम्भा: कामसंकल्पवर्जिता: ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा: ।।१९।।
जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ।।३।। आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धि नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळे ना ।।४।। ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ।।५।।
त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रय: ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति स: ।।२०।।
जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ।।६।। जो संतोषाचां गाभारा । आत्मबोधाचिया वोगरा । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगिता ।।७।।
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह: ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।२१।।
यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सर: ।
सम: सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ।।२२।।
कैसी आधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेसीं ।।८।। म्हणोनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे । जया आपुलें आणि परावें । दोन्हीं नाहीं ।।९।। तो दिठी जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आइके तें आहे । तोचि जाहाला ।।११०।। चरणी हन चालें । मुखें जें जें बोले । ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ।।११।। हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ।।१२।। हा मत्सरू जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ।।१३।। म्हणोनि सर्वांपरि मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परी गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ।।१४।।
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस: ।
यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ।।२३।।
तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ।।१५।। ऐसाही परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें । तरी तियें लया जातीं अशेखें । तयाचांचि ठायीं ।।१६।। अकाळींची अभ्रें जैशीं । ऊर्मींवीण आकाशीं । हारपतीं आपैसीं । उदयलीं सांतीं ।।१७।। तैसीं विधीविधान विहितें । जरी आचरे तो समस्यें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ।।१८।।
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।२४।।
जें हें हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता । ऐसिया बुद्धिसि नाहीं भंगता । म्हणऊनियां ।।१९।। जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ।।१२०।। म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।।२१।। आतां अविवेक कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ।।२२।।
दैवमेवापरे यज्ञं योगिन: पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ।।२५।।
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ।।२३।। तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ।।२४।। दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्चयो परिणपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण । दैवयोगें ।।२५।। आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांतें यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे ।।२६।।
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ।।२६।।
एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ।।२७।। एकां वैराग्य रवि विवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ।।२८।। तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ।।२९।। मग वाक्यविधीचिया निरवडी। विषय आहुती उदंडीं । हवन केलें कुंडीं । इंद्रियाग्नीचां ।।१३०।।
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ।।२७।।
एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ।।३१।। तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ।।३२।। ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जें उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ।।३३।। पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ।।३४।। तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ।।३५।। तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसी नानाविधा । जाळिलिया ।।३६।। तेथ सोऽहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती । तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ।।३७।। पाठीं प्राणक्रियेचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहूती पडलिया हुताशीं । तेथ अवभृथ समरसी । सहजें जाहलें ।।३८।। मग आत्मबोधिचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ।।३९।। एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परी प्राप्य तें एक ।।१४०।।
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय: संशितवता: ।।२८।।
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ।।४१।। एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ।।४२।। हें अर्जुना सकळ कुवाडें । जें अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ।।४३।। ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले । म्हणोनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ।।४४।।
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणा: ।।२९।।
मग अपानाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ।।४५।। एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ।।४६।।
अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ।।३०।।
एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ।।४७।। ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ।।४८।। जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता । जेथ अग्नी आणि होता । उरेचिना ।।४९।। जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुतें जेथोनि वोसरे । क्रियाजात ।।१५०।। विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । लिंपेचिना ।।५१।।
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्य: कुरुसत्तम ।।३१।।
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ।।५२।। ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ।।५३।। येरां विरक्ति माळ न घालिचि । जयां संयामाग्नीची सेवा न घडेचि । जे योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ।।५४।। जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुसशी काई । म्हणोनि सांगो का वाई । पंडुकुमरा ।।५५।।
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ।।३२।।
ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ।।५६।। परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ।।५७।।
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञ: परंतप ।
सर्वंकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ।।३३।।
अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ।।५८।। ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैसी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ।।५९।। देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ।।१६०।। जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ।।६१।। जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ।।६२।। मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें । जयामाजीं सांपडलें । ज्ञेय दिसे ।।६३।। जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ।।६४।।
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ।।३४।।
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां या भजावें । सर्वस्वेंसीं ।।६५।। जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।।६६।। तरी तनुमनुजीवें । चरणासीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ।।६७।। मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणें अंत:करण बोधलें । संकल्पा नये ।।६८।।
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ।।३५।।
जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । नि:शंकु होय ।।६९।। ते वेळी आपणपेंया सहितें । इयें अशेषेंहि भूतें । माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ।।१७०।। ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ।।७१।।
अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ।।३६।।
जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ।।७२।। त-ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ।।७३।। देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ।।७४।। तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ । नाहीं येणें पाडें ढिसाळ । दुजें जगीं ।।७५।।
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।।३७।।
सांगें भुवनत्रयांची काजळी । जे गगनामाजीं उधवली । तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ।।७६।। कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे । तो प्रलयानळु दडपे । तृणें काष्ठें काई ।।७७।।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ।।३८।।
म्हणोनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ।।७८।। एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ।।७९।। या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ।।१८०।। ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ।।८१।। म्हणूनि बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धारितां । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ।।८२।। जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताची सारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ।।८३।। आतां यावरी जें बोलणें । तें वायांचि वेळु फेडणें । तंव सांचचि जी हें पार्थु म्हणे । जें बोलत असां ।।८४।। परी तेंचि ज्ञान केविं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें । तंव तें मनोगत देवें । जाणीतलें ।।८५।। मग म्हणतसे किरिटी । आतां चित्त देर्इं इये गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ।।८६।।
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ।।३९।।
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ।।८७।। जो मनासीं चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ।।८८।। तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावें निश्चित । जयामाजीं अचुंबित । शांति असे ।।८९।। तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।१९०।। मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे । तेथ आपारा पारु नेणिजे । निर्धारितां ।।९१।। ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगतां असे अपारु । परी असो आतां ।।९२।।
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।।४०।।
ऐकें जया प्राणियांचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ।।९३।। शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ।।९४।। अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ।।९५।। वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ।।९६।। जे अमृतही परी नावडे । ऐसें सावियाचि अरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों ये कीं ।।९७।। तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशयें अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ।।९८।। मग संशयीं जरी पडला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिक परत्रा मुकला । सुखासि गा ।।९९।। जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शितोष्णें जैशीं नेणें । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ।।२००।। तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयी तो नोळखे । हिताहित ।।१।। हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ।।२।। म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।।३।। येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा -। माजीं असे ।।४।। जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ।।५।। हदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होय । लोकत्रय ।।६।।
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।।४१।।
ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ।।७।। तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग नि:शेष खता फिटे । मानसींचा ।।८।।
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मन: ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।४२।।
या कारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ।।९।। ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्णु ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ।।२१०।। तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ।।११।। ते कथेची संगती । भावाची संपत्ती । रसाची उन्नती । म्हणिपेल पुढां ।।१२।। जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओंवाळणी । जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ।।१३।। तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ।।१४।। जैसें बिंब तरी बचकें एवढें । परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ।।१५।। नातरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ।।१६।। हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंति माझी ।।१७।। जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ।।१८।। आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावां ।।१९।। सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ।।२२०।। तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेविंचि कानाकरवीं म्हणवी । बापु माझा ।।२१।। तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । आणि संसारदु:ख मूळवणें । विकृतीविणें ।।२२।। जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायांचि का बांधावीं कटारें । रोग जाय दुधें साखरें । तरी निंब कां पियावा ।।२३।। तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दु:ख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजीं ।।२४।। म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ।।२२५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय: ।।४।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा समाप्त ।। (श्लोक ४२, ओव्या २२५)
।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।