Sunday, 26 June 2016

>>>>>

।। आचार्य विराज शांताराम यांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी ।।

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पहिला ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दुसरा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय तिसरा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय चौथा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पाचवा ।।
॥ ज्ञानेश्वरी ॥ अध्याय सहावा ॥

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सातवा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय आठवा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय नववा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दहावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अकरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय बारावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय तेरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय चौदावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पंधरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सोळावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सतरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अठरावा ।। भाग- एक
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अठरावा ।। भाग- दोन

  >>>>>

।।श्रीमद्भगवतगीता।।

।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता  - अध्याय २ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता  - अध्याय ३ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता  - अध्याय ४ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता  - अध्याय ५ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता  - अध्याय ६ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ७ ।।
।।श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ८ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ९ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १० ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ११ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १४ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १७ ।।
।। श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १८ ।।

 >>>>> 

।।आचार्य विराज यांनी संपादित केलेली संत तुकाराम गाथा ।।

 

 

 

 

 

Friday, 13 May 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अनुक्रमणिका ।।

।। आचार्य विराज शांताराम यांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी ।। 

 
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पहिला ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दुसरा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय तिसरा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय चौथा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पाचवा ।।
॥ ज्ञानेश्वरी ॥ अध्याय सहावा ॥

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सातवा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय आठवा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय नववा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दहावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अकरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय बारावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय तेरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय चौदावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पंधरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सोळावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सतरावा ।।
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अठरावा ।। भाग- एक
।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अठरावा ।। भाग- दोन

Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पहिला ।।

 संपादक : आचार्य विराज शांताराम
 
ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।१।। देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।२।। हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।। स्मृति तेचि अवयव । देखा आंगिक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।। अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांची ।।५।। पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ।।६।। देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ।।७।। नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ।।८।। तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लव सडका ।।९।। देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ।।१०।। तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।। एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ।।१२।। मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ।।१३।। देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।।१४।। तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ।।१५।। मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी। अली सेविती ।।१६।। प्रमेय प्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसे एकवटती इभ-। मस्तकावरी ।।१७।। उपरी दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुकुटी सुगंधें । शोभती भलीं ।।१८।। अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ।।१९।। हे तिन्ही एकवटले । तेथे शब्दब्रह्म कवळलें । ते मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ।।२०।। आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।।२१।। मजहृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु । म्हणऊनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ।।२२।। जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ।।२३।। कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।।२४।। म्हणोनि जाणतेनों गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होइजे । जैसें मूळसिंचने सहजें । शाखा पल्लव संतोषती ।।२५।। कां तीर्थे जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं । नातरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ।।२६।। तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि । अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ।।२७।। आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ।।२८।। नातरी सर्वसुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।२९।। कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजातां वरिष्ठ । अशेषांचें ।।३०।। नातरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचें ।।३१।। नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनी महामती । व्यासाचिये ।।३२।। म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथगुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ।।३३।। तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ।।३४।। एथ चातुर्य शाहणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ।।३५।। माधुर्यीं मधुरता । श्रृंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ।।३६।। एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा । म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ।।३७।। आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळिक । गुणा सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ।।३८ भानुचेनी तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळिलें । मिरवे विश्व ।।३९।। कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।४०।। नातरी नगरांतरी वसिजे । तरी नागरचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळित सकळ ।।४१।। कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ।।४२।। नातरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासोनि अपाडें । जियापरी ।।४३।। नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी ।।४४।। तैसें व्यासोक्तिं अळंकारिले । आवडे तें बरवेपण पातलें । ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासीं ।।४५।। नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि अंगी । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ।।४६।। म्हणऊनि महाभारतीं जे नाही । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ।।४७।। ऐसी जगीं सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ।।४८।। जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरूपम । परम मंगळधाम । अवधारिजो ।।४९।। आतां भारती कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसीं ।।५०।। नातरी शब्दब्रह्माब्धि । मथिलेया व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ।।५१।। मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलें विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ।।५२।। जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ।।५३।। जें आकर्णिजे भक्तीं । जे आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगिजैल ।।५४।। जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेसी ।।५४।। जैसें शारदीयेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ।।५६।। तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपणा चित्तां आणूनियां ।।५७।। हें शब्देवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे प्रमेयासी ।।५८।। जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ।।५९।। कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रगटता । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ।।६०।। ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंत:करणें । आथिला तोचि जाणे । मानूं इये ।।६१।। अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ।।६२।। हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ।।६३।। जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोलें जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ।।६४।। तैसा तुम्हीं मी आंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ।।६५।। परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थु कवळूं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ।।६६।। हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । ये-हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ।।६७।। कीं टिटिभू चांचूवरी । माय सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें एथ ।।६८।। आइका आकाश गिंवसावें । तरी आणिक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां ।।६९।। या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ।।७०।। तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे गीतातत्त्व ।।७१।। हा वेदार्थसागरु । जया निद्रिताचा घोरु। तो स्वयें श्रीसर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ।।७२।। ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ।।७३।। हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ।।७४।। परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोलें मी सधरु । जैं सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ।।७५।। ये-हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । त-ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ।।७६।। लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ।।७७।। जरी प्रकटे सिद्धसरस्वती । त-ही मुकया आथी भारतीं । एथ वस्तुसामर्थ्यशक्ती । नवल कायी ।।७८।। जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणऊनि मी प्रवार्तों लाहें । ग्रंथीं इये ।।७९।। तरी न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असें ।।८०।। आतां देइजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसें चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ।।८१।। तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरुपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ।। ८२।। तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देर्इं । झडकरी वेगां ।।८३।। या बोला निवृत्तिदासु पावूनि परम उल्हासु । म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ।।८४।।
धृतराष्ट्र उवाच :
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ।।१।।
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगें मातु । कुरुक्षेत्रींची ।।८५।। जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनि ।।८६।। तरी तिहीं येतुला अवसरी । काय किजतु असे येरयेरी । तें झडकरी कथन करीं । मजप्रती ।।८७।।
संजय उवाच :
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ।।२।।
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ।।३।।
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ।।८८।। तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसें उसळलें काळकूट । घरी कवण ।।८९।। नातरी वडवानलु सांदुकला । प्रलयवातें पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी ।।९०।। तैसें दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । अवगमलें भयासुर । तिये काळीं ।।९१।। तें देखोनि दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ।।९२।। मग द्रोणापासीं आला । तयातें म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ।।९३।। गिरिदुर्ग जैसें चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । हे रचिले आथि बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ।।९४।। जो कां तुम्ही शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ।।९५।।
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ।।४।।
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मी निपुण । वीर आहाती ।।९६।। जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें प्रसंगेंचि ।।९७।। एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ।।९८।।
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ।।५।।
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा: ।।६।।
चेकितान धृष्टकेतु । काशीश्वरु विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ।।९९।। हा कुंतिभोजु पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादी राय हे । सकळ देख ।।१००।। हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ।।१।। आणिकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ।।२।।
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ।।७।।
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय:
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ।।८।।
आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगें आईक सांगिजति ।।३।। उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जे ।।४।। हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ।।५।। या एकेकाचेनिं मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ।।६।। एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा अडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ।।७।। समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणे ।।८।।
अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:
नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युद्धविशारदा: ।।९।।
जे शस्त्रविद्या पारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ ।।९।। हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु आंगीं । परी सर्व प्राणें मजचिलागीं । आरायिले असती ।।११०।। पतिव्रतेचें हृदय जैसें । पतीवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ।।११। आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ।।१२।। झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती । हें बहु असो क्षात्रनीति। एथोनियां ।।१३।। ऐसे सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें । आतां काय गणूं यांते । अपार हें ।।१४।।
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।१०।।
वरी क्षत्रियांमाजीं श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ।।१५।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडे थेंकुलें । लोकत्रय ।।१६।। आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ।।१७।। नातरी प्रलयवन्हि महावातु । या दोघां जैसा सांघातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ।।१८।। आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोडें । ओइचलेनि पाडें । दिसत असे ।।१९।। वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली तेणें ।।१२०।।
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता: ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि ।।११।।
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळभार आपुलाले । सरसे करा ।।२१।। जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथिया ।।२२।। तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ।।२३।। हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ।।२४।।
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: ।
सिंहनादं विनद्योच्चै: शंखं दध्मौ प्रतापवान् ।।१२।।
या राजाचिया बोला । सेनापती संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ।।२५।। तो गाजत असे अद्भुतु । दोन्हीं सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ।।२६।। तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ।।२७।। ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ।।२८।। घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ।।२९।। तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तंव दळामाजीं रणतुरें आस्फुरिलीं ।।१३०।।
तत: शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।१३।।
उदंड सैंध वाजतें । भयानकें खाखातें । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ।।३१।। भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ।।३२।। आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैल हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ।।३३।। तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ।।३४।। एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ।।३५।। ऐसा अद्भुत तुरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ।।३६।।
तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु: ।।१४।।
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय: ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर: ।।१५।।
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: ।
नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।१६।।
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ।।३७।। हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चा-ही ।।३८।। कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ।३९।। जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णुं ।।१४०।। ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शारंगधरु । अर्जुनेसी ।।४१।। देखा नवल तया प्रभूचे । प्रेम अद्भुत भक्तांचे । जे सारथ्य पार्थाचें । करीतु असे ।।४२।। पाइकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला । तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ।।४३।। परी तो महाघोषु थोरु । गर्जत असे गंहिरु । जैसा उदैला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ।।४४।। तैसे तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ।।४५।। तैसाचि देखें येरें । निनादें अति गहिरें । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ।।४६।। ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ।।४७।। तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौंड्र आस्फुरिला महाशंखु ।।४८।। तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ।।४९।। नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ।।१५०।।
काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ: ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ।।१७।।
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहु: शंखान्दध्मु: पृथक्पृथक् ।।१८।।
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।।१९।।
तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ।।५१।। तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्न नृपनाथु । शिखंडी हन ।।५२।। विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ।।५३।। तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें । गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ।।५४।। तेथ तिन्ही लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ।।५५।। पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ।।५६।। सृष्टि गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं ।।५७।। दिहाचि दिन थोकला । जैसा प्रळयकाळ मांडला । तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ।।५८।। तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ।।५९।। म्हणोनि विश्व सांवरलें । ए-हवीं युगान्त होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ।।१६०।। तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ।।६१।। जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ।।६२।। तो गाजत जंव आईकती । तंव उभेचि हियें घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।।६३।।
अथ व्यवस्थितान्दृष्टवा धार्तराष्ट्रान् कपिध्वज: ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव: ।।२०।।
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ।।६४।। मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।।६५।। तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ।।६६।। ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ।।६७।। तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । मग लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।।६८।।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच :
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।।२१।।
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा दोहीं दळां ।।६९।।
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ।।२२।।
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता: ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव: ।।२३।।
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते जे ।।१७०।। एथ आले असती आघवे । परी कवणेंसीं म्या झुंजावे । हें रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ।।७१।। बहुतकरूनि कौरव । हे आतुर दु:स्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं ।।७२।। झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ।।७३।।
संजय उवाच :
एवमुक्तोे हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।२४।।
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ।।७४।।
भीष्मद्रोणप्रमुखत: सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ।।२५।।
तत्रापश्यत्स्थितान्पार्थ: पितॄनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ।।२६।।
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेय: सर्वानबन्धूनवस्थितान् ।।२७।।
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक बहुत आहाति ।।७५।। तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु संभ्रमेंसीं ।।७६।। मग देवा म्हणे देख देख । हे गोत्र गुरु अशेख । तवं कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ।।७७।। तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरिलें येणें । परी काहीं आश्चर्य असे ।।७८।। ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थू । परी उगा असे निवांतु । तिये वेळीं ।।७९।। तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ।।१८०।। इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजीं ।।८१।। सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोइरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ।।८२।। जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ।।८३।। ऐसें गोत्रचि दोहीं दळी । उदित जालें असे कळीं । हें अर्जुनें तिये वेळी अवलोकिलें ।।८४।।
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
तेथ मनीं गजबज जाहाली । आणि आपैसी कृपा उपजली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ।।८५।। जिया उत्तमे कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथि । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ।।८६।। नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंविण अनुसरे । भ्रमला जैसा ।।८७।। कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्ततासिद्धि । आठवे ना ।।८८।। तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जें अंत:करण दिधलें । कारुण्यासी ।।८९।। देखा मंत्रज्ञु बरळुं जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये । तैसा तो धनुर्धरू महामोहें । आकळिला ।।१९०।। म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळी शिंपिला । सोमकांतु ।।९१।। तयापरी पार्थु । अतिस्नेहे मोहितु । मग सखेद असे बोलतु । अच्युतेसीं ।।९२।।
अर्जुन उवाच :
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।।२८।।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।२९।।
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: ।।३०।।
तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ।।९३।। हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केविं होय ।।९४।। येणें नावेंचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ।।९५।। देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसी ।।९६।। सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथे बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।।९७।। तें न धरतचि निष्टलें । परी नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ।।९८।। जें वज्रापासोनि कठीण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ।।९९।। जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ।।२००।। जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परी कळिकेमाजीं सांपडे । कोंवळिये ।।१।। तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणे । तैसे कठीण कोंवळेपणें । स्नेह देखा ।।२।। हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ।।३।। अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ।।४।। कैसी नेणों सदयता । उपनली तेथ चित्ता । मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ।।५।। माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावें हे सकळ । येणें नांवें ।।६।।
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।३१।।
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ।।७।। म्हणोनि जळों हें झुंज । प्रत्यया नये मज । एणें काय काज । महापापें ।।८।। देवा बहुतीपरी पाहतां । येथ वोखटें होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ।।९।।
न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।।३२।।
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा: सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ।।३३।।
तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । पावोनियां ।।२१०।। या सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ।।११।। तेणें सुखेंवीण होईल । ते भलतेही साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ।।१२।। परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ।।१३।। तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जे वडिलां यां चिंतावें । अहित मनें ।।१४।। पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुलें ।।१५।। हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेंया बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भलें एयां ।।१६।। आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांचां ।।१७।। आम्ही दिगंतींचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ आपुलें जें ।।१८।। तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ।।१९।। अंतोरियां कुमरें सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपूनि ।।२२०।। ऐसियांते कैसेनि मारूं । कवणावरी शस्त्र धरूं । निजहृदया करूं । घातु केवीं ।।२१।।
आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: ।
मातुला: श्वशुरा: पौत्राः श्याला: सम्बन्धिनस्तथा ।।३४।।
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्मद्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ।।२२।। एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातु केवळ । इष्टही असती ।।२३।। अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि ।।२४।।
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो: किं नु महीकृते ।।३५।।
हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परी आपण मनें घातु । न चिंतावा ।।२५।। त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ।।२६।। जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगें मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा ।।२७।।
निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीती: स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिन: ।।३६।।
जरी वधु करूनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ।।२८।। कुळहरणीं पातकें । तियें आंगी जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ।।२९।। जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ।।२३०।। सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ।।३१।। तयापरी तूं देवा । मज झकऊं न येसी मावा । जरी पुण्याचा वोेलावा । नाशिजैल ।।३२।।
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ।।३७।।
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ।।३३।। तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमचे काय उरेल । तेणें दु:खे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ।।३४।। म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ।।३५।।
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ।।३८।।
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ।।३९।।
हे अभिमानमदें भुलले । ज-ही पां संग्रामा आले । त-हीं आम्हीं हित आपुलें । जाणावें लागें ।।३६।। हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ।।३७।। हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां । तो तंव चुकवितां । लाभु आथी ।।३८।। असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगें ।।३९।। कां समोर अग्नी देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणीं एका कवळूनि । जाळूं सके ।।२४०।। तैसे दोष हे मूर्त । अंगीं वाजों असती पहात । हें जाणतांही केविं एथ । प्रवर्तावें ।।४१।। ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ।।४२।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।४०।।
जैसें काष्ठे काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलोनि ।।४३।। तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ।।४४।। म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ।।४५।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर: ।।४१।।
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ।।४६।। असता दीपु दवडिजे । मग अंधकारी राहाटिजे । तरी उजूचि कां आडळिजे । जयापरी ।।४७।। तैसा कुळीं कुळक्षयो होये । तये वेळीं तो आद्यधर्मु जाये । मग आन कांही आहे । पापावांचुनी ।।४८।। जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणऊनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांशी ।।४९।। उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ।। २५०।। जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ।।५१।।
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ।।४१।।
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथि ।।५२।। देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ।।५३।। जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ।।५४।। तरी पितर काय करिती । कैसेनी स्वर्गीं वसती । म्हणोनि तेही येती । कुळापासीं ।।५५।। जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ।।५६।।
दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।४३।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।४४।।
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राराज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ।।४५।।
देवा अवधारीं आणिक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ।।५७।। जैसा घरीं आपुलां । वानिवसें वन्ही लागला । तो आणिकांही प्रज्वळिला । जाळूनि घाली ।।५८।। तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधु पावती । निमित्तें येणें ।।५९।। तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ।।२६०।। पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ।।६१।। देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ।।६२।। अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं ते तंव क्षणिक । ऐसें जाणतांही दोख । अव्हेरूं ना ।।६३।। जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठीं सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडले आम्हां ।।६४।।
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४६।।
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्रें सांडूनि साहावे । बाण यांचे ।।६५।। तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ।।६६।। एसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ।।६७।।
संजय उवाच :
एवमुक्त्वार्जुन: संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस: ।।४७।।
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ।।६८।। मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ।।६९।। जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ।।२७०।। नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतला तापसु भ्रमे । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ।।७१।। तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दु:खें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ।।७२।। मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐके राया वर्तलें । संजयो म्हणे ।।७३।। आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणे परी परमार्थु । निरूपील ।।७४।। ते सविस्तर पुढारी कथा । अतिसकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ।।७५।।

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ।।१।।
श्री ज्ञानेश्वरीअध्याय पहिला समाप्त (श्लोक : ४७; ओव्या : २७५)

।। पुंडलिक वरदाऽऽहरी विठ्ठल श्रीऽऽज्ञानदेव तुकाऽऽराम ।।

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दुसरा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम

 
संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: ।।१।।
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुळ रुदनातें । करीतु असे ।।१।। तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ।।२।। जैसें लवण जळें झळंबले । नातरी अभ्र वातें हालें । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ।।३।। म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंसु ।।४।। तयापरी तो पंडुकुमरु । महामोहें अति जर्जरु। देखोनी श्रीशारंगधरु । काय बोले ।।५।।
श्रीभगवानुवाच :
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ।।२।।
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इयें ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ।।६।। तुज सांगें काय झालें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ।।७।। तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी । तुझेनि नामे अपयशी । दिशा लंघिजे ।।८।। तूं शूरवृत्तिचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ।।९।। तुवां संग्रामी हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वांसी ।।१०।। हे पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझें ।।११।। तो तूं कीं आजि येथें । सांडूनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करीतु आहासी ।।१२।। विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ।।१३।। नातरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे  । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकांतें ।।१४।। कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गे काळकूट मरे । सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ।।१५।। सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि का जाहला । परी तो त्वां साच केला । आजि येथ ।।१६।। म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करुनियां मना । सावधान होर्इं ।।१७।। सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ।।१८।। हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायीं ।।१९।। हें असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ।।२०।।
क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।३।।
म्हणोनि शोकु न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरी । पांडुकुमरा ।।२१।। तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तू अझुनीवरी हित । विचारीं पां ।।२२।। येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे जाहले तुज ।।२३।। तु आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशय आतां ।।२४।। आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ।।२५।। तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवांं ।।२६।। मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ।।२७।। हृदयाचें ढिलेंपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ।।२८।। ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ।।२९।।
अर्जुन उवाच :
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभि: प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ।।४।।
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधी तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा ।।३०।। हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हां ।।३१।। देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केविं वधिजती । आपुलां हातीं ।।३२।। देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें  वाचा ।।३३।। तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें वर्ततसे ।।३४।। जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं घातु देवा ।।३५।। वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहलें । जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ।।३६।। मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ।।३७।। जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ।।३८।।
गुरूनहत्वा हि महानुभावान् -श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव -भुञ्जीय भोगान् रूधिरप्रदिग्धान् ।।५।।
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाज देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ।।३९।। हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परी अगाध भलें गहन । हृदय याचें ।।४०।। वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परी मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ।।४१।। स्नेहालागीं माये । म्हणिपें तें कीरु होये । पण कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ।।४२।। हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ।।४३।। हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु । आता सांग पा येथ घातु । चिंतूं येईल ।।४४।। ऐसे हे रणीं वधावें । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना नये आघवें । जीवितेंसीं ।।४५।। हें येणें मानें दुर्भर । जे यांहींहूंनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ।।४६।। नातरी देशत्यागें जाइजे । कां गिरीकंदर सेविजे । परी शस्त्र हांता न धरिजे । इयांवरी ।।४७।। देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं भोग गिंवसावें रुधिरीं । बुडाले जें ।।४८।। ते काढूनि काय किजती । लिप्त केवीं सेविजती । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ।।४९।। ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ।।५०।।  हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलो लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ।।५१।।
न चैतद्विद्म: कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु: ।
यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेऽवस्थिता: प्रमुखे धार्तराष्ट्रा: ।।६।।
ये-हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों येथें । परी निके काय यापरौतें । तें तुम्ही जाणा ।।५२।। पै विरुं जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजे । उभे आहाती ।।५३।। आतां ऐसेयांते वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहोंमाजीं करावे । तें नेणों आम्ही ।।५४।।
कार्पण्यदोषोपहतस्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: ।
यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।।७।।
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे येथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ।।५५।। तिमिराविरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पांसींच असतां न दिसे । वस्तुजात ।।५६।। देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंहि नेणें ।।५७।। तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जें सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ।।५८।। तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता। आपदीं आमुतें ।।५९।। जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणे अव्हेरूं । की सरितांते सागरु । त्यजी केवीं ।।६०।। नातरी अपत्यातें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेनि जिये । ऐकें कृष्णा ।। ६१।। तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणिक बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ।।६२।। तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगे आतां ।।६३।।
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।८।।
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ।।६४।। एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ।।६५।। जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जऱ्ही पेरिलीं । तरी न विरूढतीं सिंचलीं । आवडे तैसीं ।।६६।। नातरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ।।६७।। तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धी । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ।।६८।। ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांती सांडिला । मग पुनरपि व्यापिला । ऊर्मी तेणें ।।६९।। कीं मज पाहतां ऊर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पे ।।७०।। सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचा भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ।।७१।। हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवे विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ।।७२।। तैसिया पंडुकुमरां व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ।।७३।। म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ।।७४।। मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळुनु । जैसा घनपडळीं भानु आच्छादिजे ।।७५।। तयापरी तो धनुर्धरू । जाहलासे दु:खें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ।।७६।। म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ।।७७।। तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ।।७८।। आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळू निवेल । मग नवी विरुढी फुटेल ।  उन्मेषाची ।।७९।। ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ।।८०।।
संजय उवाच :
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेश: परंतप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ।।९।।
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ।।८१।। आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजे येथें । भरंवसेनि ।।८२।। एेंसे येकिहेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ।।८३।।
तमुवाच हृषीकेश: प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच: ।।१०।।
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणे । काय कीजे ।।८४।। हा उमजें आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । आनुमानी कां ।।८५।। ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूची निरवधि । निदानींची ।।८६।। तैसें विवरतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ।।८७।। तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसें मातेचां कोपीं थोकलें । स्नेह आथी ।।८८।। कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ।।८९।। तैसीं वरीवरी पाहतां उदासे । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ।।९०।।
श्रीभगवानुवाच :
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिता: ।।११।।
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवा येथ आदरिलें । माझारींचि ।।९१।। तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतेें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ।।९२।। जात्यंधा लागे पिसें । मग ते सैरा धांवें जैसें । तुझें शहाणपण तैसें । दिसतसें ।।९३।। तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी पुढतपुढती ।।९४।। तरी सांग पां मग अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ।।९५।। एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हे वायाचि काय बोलती । जगामाजीं ।।९६।। हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ।।९७।। तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायी हे होती । चिरंतन ।।९८।। कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकू हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ।।९९।। अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां का शोचावें । सांगें मज ।।१००।। परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीती सांगसी । आम्हांप्रति ।।१।। देखें विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ।।२।।
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा: ।
न चैव न भविष्याम: सर्वे वयमत: परम् ।।१२।।
अर्जुना सांगेन आईक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरूनी ।।३।। नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाऊनि । हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्ही नाहीं ।।४।। हें उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । ये-हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ।।५।। जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहालें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ।।६।। तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ।।७।।
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।।१३।।
आइकें शरीर तरी एक । परी वयसाभेदें अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ।।८।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ।।९।। तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरें होतीं जातीं पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदु:ख ।।११०।।
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदु:खदा: ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ।।१४।।
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंत:करण । म्हणऊनि भ्रमे ।।११।। इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ।।१२।। जयां विषयांचां ठायीं । एकनिष्ठता कंहीं नाहीं । तेथ दु:ख आणि कांहीं । सुखहि दिसे ।।१३।। देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।।१४।। मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ।।१५।। भ्यासुर आणि सुरेख । हें रूपांचें स्वरूप देख । जे उपजवी सुखदु:ख । नेत्रद्वारें ।।१६।। सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु। तोषु देता ।।१७।। तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ।।१८।। देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदु:खी आकळिजे । आपणपें ।।१९।। या विषयांवांचूनि कांहीं । आणिक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावचि पाही । इंद्रियांचा ।।१२०।। हे विषय तरी कैसे । रोहिणींचे जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ।।२१।। देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ।।२२।।
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदु:खसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ।।१५।।
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदु:खे दोन्हीं न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ।।२३।। तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्थां । नागवेचि ।।२४।।
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।।१६।।
आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारे पर लोक । ओळखिती ।।२५।। या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।२६।। सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ।।२७।। कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ।।२८।। ना तरी जाणिवेचिया आयणी । करितां दधि कडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ।।२९।। कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलेंं ।।१३०।। तैसें विचारितां निरसलें । ते प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ।।३१।। म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ।।३२।।
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।१७।।
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार ते स्वभावता । नित्य जाणें ।।३३।। हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ।।३४।। जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ।।३५।।
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।।१८।।
आणि शरीरजात आघवें । हे नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावे । पंडुकुमरा ।।३६।।
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ।।१९।।
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ।।३७।। तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ।।३८।।
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२०।।
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुष: पार्थ कं घातयति हन्ति कम् ।।२१।।
जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ।।३९।। तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रूपे ।।१४०।। कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ।।४१।। ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ।।४२।। तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणऊनि तूं हे नारोपीं भ्रांति बापा ।।४३।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२२।।
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ।।४४।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।२३।।
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ।।२४।।
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ।।४५।। हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ।।४६।। अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ।।४७।।
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ।।२५।।
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ।।४८।। हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । नि:सीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ।।४९।। हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसि अतीतु ।  अनादि अविकृतु । सर्वरूप ।।१५०।। अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ।।५१।।
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ।।२६।।
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हे मानिसी । तऱहीं शोचूं न पवसी । पंडुकुमरा ।।५२।। जें आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ।।५३।। तें आदि नाही खंडलें । समुद्रीं तरी असे मिनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ।।५४।। इयें तिन्ही तयापरी । सरसीच सदा अवधारीं । भूतांसि कवणीं अवसरीं । ठाकतीना ।।५५।। म्हणोनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ।।५६।। नातरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकू अधीना । जन्मक्षया ।।५७।। तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । जे जन्म मृत्यु हे पाहीं ।अपरिहर ।।५८।।
जातस्य हि ध्रुवो मृत्युध्र्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।२७।।
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपी दिसे । हें घटिकायंत्र तैैसें । परिभ्रमे गा ।।५९।। ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ।।१६०।। महाप्रलय अवसरें । हें त्रैलोक्यही संहरें । म्हणोनि हा न परिहरे । आदि अंतु ।।६१।। तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ।।६२।। एथ आणिकही एक पार्था । तुज बहूतीं परी पाहतां । दु:ख करावया सर्वथा । विषो नाहीं ।।६३।।
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२८।।
जेें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमृर्तें । मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया । ।।६४।। तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ।।६५।। येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ।।६६।। ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । कां परापेक्षा अळंकार- । व्यक्ति कनकीं ।।६७।। तैसे सकळ हें मूर्त ।  जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटळ ।।६८।। तैसें आदीचि जें नाहीं । तयालागी तूं रुदसि कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ।।६९।। जयाची आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ।।१७०।। दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें आचरताती ।।७१।।
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्य: ।
आश्चर्यवच्चैनमन्य: श्रृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ।।२९।।
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ।।७२।। एकां गुणानुवाद करितां । उपरति होऊनि चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ।।७३।। एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ।।७४।। जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ।।७५।। तैसिया योगेश्वरांचिया मती । मिळणीं सवे एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ।।७६।।
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ।।३०।।
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ।।७७।। याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ।।७८।। ए-हवी तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परी ।।७९।।
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ।।३१।।
तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ।।१८०।। या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जऱही एथ ।।८१।। तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ।।८२।। अर्जुना तुझें चित्त । जऱही जाहले द्रवीभूत । तऱही हें अनुचित । संग्रामसमयीं ।।८३।। अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासी नाही म्हणितले । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ।।८४।। तैसें आनीं आन करितां । नाशु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होर्इं ।।८५।। वायाचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ।।८६।। जैसे मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ।।८७।। तयापरी पार्था  । स्वधर्में राहाटतां । सकळकामपूर्णता । सहजें होय ।।८८।। म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणिक कांहीं । संग्रामांवाचूनि नाहीं । उचित जाणें ।।८९।। निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ।।१९०।।
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ।।३२।।
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काज दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ।।९१।। हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापे । उदो केला ।।९२।। नातरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ।।९३।। क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तै झुंज ऐसें हे लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ।।९४।। ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयुख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ।।९५।।
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
तत: स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ।।३३।।
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होइजे । आपणपेयां ।।९६।। पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ।।९७।। तरी असती कीर्ति जाईल । जगचि आभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ।।९८।। जैसी भर्तारेहीन वनिता । उपहति पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ।।९९।। ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ।।२००।।
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ।।३४।।
म्हणोनि स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ।।१।। जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केविं निगावें । एथोनियां ।।२।। तूं निर्मत्सरु सदयता । एथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ।।३।। हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळूपणें ।।४।। ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ।।५।।
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथा: ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ।।३५।।
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजो आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ।।६।। तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां कां प्रत्यया येईल मना । सांगें मज ।।७।।
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिता: ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दु:खतरं नु किम् ।।३६।।
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगें बोलु उरला । निका कायी ।।८।। लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ।।९।। ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ।।१०।। तैसी कीर्ती नि:सीम । तुझा ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ।।११।। दिगंतींचे भूपती । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलियां दचकती । कृतांतादिक ।।१२।। ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जया देखी जगीं सुभट । वांठ जाहली ।।१३।। तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ।।१४।। जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ।।१५।। जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैंसे अर्जुना हे तूंते । मानिती सदा ।।१६।। तें अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजताचि ।।१७।। आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ।।१८।। मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेंपणें कां न झुंजावे । हे जिंतलें तरी भोगावें । पृथ्वीतळ ।।१९।।
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।३७।।
ना तरी रणीं एथ । झुंजता वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ।।२२०।। म्हणोनि ये गोष्टी । विचारु न करी किरिटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजे वेगीं ।।२१।। देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ।।२२।। सांगे प्लवेंचि काय बुडिजे । का मार्गीं जाता आडळिजे । परी विपाये चालों नेणिजे । तरी तेंहीं घडे ।।२३।। अमृतें तरीचि मरिजे । जरी विखेसीं सेविजे । तैसा स्वधर्मे दोषु पाविजे । हेतुकपणें ।।२४।। म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडूनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजता । पाप नाहीं ।।२५।।
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।३८।।
सुखीं संतोषा न यावें । दु:खीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।।२६।। एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांहीं पुढील । चिंतावेंना ।।२७।। आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ।।२८।। ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणोनि आतां झुंजावे । निभ्रांत तुवां ।।२९।।
एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ।।३९।।
हे सांख्यस्थिती मुकुळित । सांगितली तुज एथ । आता बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ।।२३०।। जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पावे ।।३१।। जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ।।३२।।
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।।४०।।
तैसें ऐहिक तरी न नाशे । आणि मोक्षु उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ।।३३।। कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळा न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ।।३४।। तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हा असताचि उपाधि । आकळूं न सके ।।३५।। जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ।।३६।। अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ।।३७।।
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ।।४१।।
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । तैसी सद्बुद्धि हे थेंकुटी । म्हणों नये ।।३८।। पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ।।३९।। आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ।।२४०।। तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसि उदधि । निरंतर ।।४१।। तैसी ईश्वरावांचुनि कांहीं । जिये आणिक लाणी नाही । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ।।४२।। येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ।।४३।। म्हणोनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ।।४४।।
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चित: ।
वेदवादरता: पार्थ नान्यदस्तीति वादिन: ।।४२।।
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ।।४५।। म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ।।४६।। एथ हे वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ।।४७।।
कामात्मान: स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ।।४३।।
देखें कामनाअभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ।।४८।। क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ।।४९।।
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयाऽपहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते ।।४४।।
परी एकचि कुडें करिती । जें स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ।।२५०।। जैसा कर्पूराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे काळकूट ।।५१।। दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ।।५२।। सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ।।५३।। जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ।।५४।। म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ।।५५।।
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो  नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।४५।।
तिहीं गुणीं आवृत्त । हे वेद जाण निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ।।५६।। येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ।।५७।। म्हणोनि तूं जाण । हे सुखदु:खासीच कारण । एथ झणे अंत:करण । रिगो देसी ।।५८।। तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ।।५९।।
यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ।।४६।।
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तऱही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ।।२६०।। जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगें मज ।।६१।। कां उदकमय सकळ । जऱही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ।।६२।। तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती शाश्वत जें ।।६३।।
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।४७।।
म्हणौनि आइकें पार्था । याचि परी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ।।६४।। आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न सांडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ।।६५।। परी कर्मफळी आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ।।६६।।
योगस्थ: कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्योे: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।४८।।
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकूनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ।।६७।। परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावें । तरी विशेषे तेथ तोषावें । हेंही नको ।।६८।। कां निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचत ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ।।६९।। आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जाहलें । ऐसेंचि मानीं ।।२७०।। देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी परिपूर्ण सहजें । जाहलें जाणें ।।७१।। देखें संतासंती कर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिती उत्तमीं । प्रशंसिजे ।।७२।।
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव: ।।४९।।
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ।।५०।।
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ।।७३।। तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ।।७४।। परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजें । योगस्थिती ।।७५।। म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होर्इं स्थिरु । मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ।।७६।। जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयसंबंधी सांडिले । पापपुण्यीं ।।७७।।
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ।।५१।।
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाती लोपती । अर्जुना तयां ।।७८।। मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा ।।७९।।
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ।।५२।।
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ।।२८०।। मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडे होईल मन । अपैसें तुझें ।।८१।। तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागीलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें पारुषेल ।।८२।।
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ।।५३।।
इंद्रियांचिया संगतीं । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ।।८३।। समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं
सकळ । योगस्थिती ।।८४।।
अर्जुन उवाच :
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।।५४।।
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ।।८५।। मग अच्युत म्हणे सुखें । जे किरीटी तुज निकें । ते पूस पां उन्मेखें । मनाचेनि ।।८६।। या बोला पार्थें । म्हणीतलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केंवीं ।।८७।। आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ।।८८।। तो कवणे स्थितीं असे । कैसेनि रूपीं विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ।।८९।। तंव परब्रह्म अवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ।।२९०।।
श्रीभगवानुवाच :
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।।५५।।
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसी । करित असे ।।९१।। जो सर्वदा नित्यतृप्तु । अंत:करणभरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ।।९२।। तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ।।९३।।
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते ।।५६।।
नाना दु:खीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ।।९४।। अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणे कहीं । परिपूर्णु तो ।।९५।। ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ।।९६।।
य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।५७।।
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ।।९७।। ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळें ।।९८।। गोमटें कांहीं पावे । तरी संतोषे तेणें नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ।।९९।। ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ।।३००।।
यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।५८।।
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ।।१।। तैसी इंद्रियें आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाचि प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।।२।।
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन: ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ।।५९।।
अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । जें विषयांतें साधक । त्यजिती नियमें ।।३।। श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परी रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ।।४।। जैसी वरिवरी पालवी खुडीजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।५।। तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि अंगें फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ।।६।। येरा इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटे । जे जीवन हें न घटे । येणेंविण ।।७।। मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ।।८।। तैं  शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभावप्रतीती । प्रगट होय ।।९।।
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित: ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन: ।।६०।।
ये-हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ।।३१०।। जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठीं । धरूनि आहाती ।।११।। तेही कीजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ।।१२।। देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनी ।।१३।। तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोटावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ।।१४।।
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर: ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।६१।।
म्हणोनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ।।१५।। तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचें विषयसुखें अंत:करण । झकवेना ।।१६।। जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ।।१७।। ये-हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ।।१८।। जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ।।१९।। तैसी  या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजातां ।।३२०।।
ध्यायतो विषयान्पुंस:  सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते ।।६२।।
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।६३
जरी हृदयी विषय स्मरती । तरी निःसंगाही आपजे संगती । संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ।।२१।। जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ।।२२।। संमोहा जालियां व्यक्ती । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ।।२३।।  कां अस्तमानीं निशि । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं प्राणियांसी ।।२४।। मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ।।२५।। जैसें जात्यंधा पळणी पावे । मग तें काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवे । धनुर्धरा ।।२६।। ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ।।२७।। चैतन्याचा भ्रंशी । शरीरा दशा जैसी । तैसी पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ।।२८।। म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ।।२९।। तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हे पतन । गिंवसीत पावे ।।३३०।।
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।६४।।
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावें । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ।।३१।। पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ।।३२।। जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ।।३३।। तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ।।३४।। तरी विषयांतही कांही । आपणपेंवांचुनि नाहीं । मग विषय कवण कायीं । बाधितील कवणा ।।३५।। जरी उदके उदकी बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगें आप्लविजे । परीपूर्ण तो ।।३६।। ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखिळ । तयाची प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ।।३७।।
प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते ।।६५।।
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदु:खा ।।३८।। जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ।।३९।। तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैचें कें आहे । तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ।।३४०।। जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ।।४१।।
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयत: शान्तिरशान्तस्य कुत:सुखम् ।।६६।।
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंत:करणीं । तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ।।४२।। तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ।।४३।। निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ।।४४।। आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायी । मोक्षु न वसे ।।४५।। देखें आग्निमाजीं घापती । तिये बीजें जरी विरूढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।।४६।। म्हणोनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दु:खाचें । या कारणें इंद्रियांचें दमन निकें ।।४७।।
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।६७।।
ये इंद्रियें जें जें म्हणती । ते तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ।।४८।। जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ।।४९।। तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण दु:खें । सांसारिकें ।।३५०।।
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।६८।।
म्हणोनि आपुलीं आपणपेयां । जरी ये इंद्रियें येती आया । तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ।।५१।। देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । नातरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ।।५२।। तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।।५३।। आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पां ।।५४।।
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने: ।।६९।।
देखें भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेंइले । तेथ निद्रितु जो ।।५५।। तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ।।५६।।
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ।।७०।।
पार्था आणिकही परी । तो जाणों येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ।।५७।। जऱही सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तऱही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ।।५८।। ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ।।५९।। तैसा प्राप्तीं ऋद्धि सिद्धि । तयासी क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ।।३६०।। सांगें सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ।।६१।। देखे ऋद्धि सिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ।।६२।। जो आपुलेनि नागरपणे । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केविं रंजे पालिवणें । पल्लवांचेनि ।।६३।। जो अमृतासि ठि ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ।।६४।। पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं । तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ।।६५।।
विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: ।
निर्ममो निरहंकारः  स शान्तिमधिगच्छति ।।७१।।
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ।।६६।। तो अहंकारातें दंडूनि । सकळ कामू सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचीमाजीं ।।६७।।
एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।७२।।
हे ब्रह्मस्थिति नि:सीम । जे अनुभवितां निष्काम । पातले परब्रह्म । अनायासें ।।६८।। जे चिद्रूपीं मिळतां । देहांतींची व्याकुळता । आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ।।६९।। तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ।।३७०।। ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें । आतां आमुचिया काजा आलें । उपपत्ती इया ।।७१।। जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावे । म्हणूनियां ।।७२।। ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ।।७३।। तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ।।७४।। जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ।।३७५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ।।२।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा समाप्त
(श्लोक : ७२; ओव्या : ३७५)


।। पुंडलिक वरदाऽऽहरी विठ्ठल श्रीऽऽज्ञानदेव तुकाऽऽराम ।।

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय तिसरा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम

 
अर्जुन उवाच :
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किंकर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ।।१।।
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जे वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ।।१।। तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ।।२।। तरी मातें केविं हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुतां ।।३।। हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारिसी नि:शेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ।।४।। तरी हेंचि विचारीं श्रीहृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवीत आहासी ।।५।।
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ।।२।।
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्ही नेणतीं काय करावें । आतां संपलें म्हण पां आघवें । विवेकाचें ।।६।। हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ।।७।। वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगें मज ।।८।। जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ।।९।। मी आधींचि कांहीं नेंणें । वरी कवळिलों मोहें येणें । कृष्णा विवेकु याकारणें । पुसिला तुज ।।१०।। तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजी गांवाई । तरी अनुसरलिया काई । एेंसे कीजे ।।११।। आम्ही तनुमनुजिवे । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणें ।।१२।। आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ।।१३।। तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणिक एक असे जाहलें । जें थितें हे डहुळलें । मानस माझें ।।१४।। तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ।।१५।। नातरी झकवीत आहासी माते । कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । जाणवेना ।।१६।। म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । म-हाटा जी ।।१७।। मी अत्यंत जड असें । परी ऐसाहि निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ।।१८।। देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैंसे ।।१९।। तैसें सकळार्थभरित । तत्त्व तरी सांगावें तरी उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ।।२०।। देवा तुजऐसा निज गुरु । आजि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ।।२१।। हां गा कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वाणी कीजे ।।२२।। जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडे । कां आपुलेनि सुरवाडें इच्छावें ना ।।२३।। देखा अमृतसिंधुतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावे । मागील ते ।।२४।। तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां लक्ष्मीपती । तू दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ।।२५।। तरी आपुलेया सवेसा । कां न मागावासी परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ।।२६।। देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जाहलें । विजयी माझें ।।२७।। जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ।।२८।। जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ।।२९।। तैसें देवा तूंतें । पुसिजतसेंं आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधी ।।३०।। तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ।।३१।।
श्रीभगवानुवाच :
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ।।३।।
या बोला अच्युतु । म्हणत असे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ।।३२।। जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ।।३३।। तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाण म्यांचि उक्त दोन्हीं ।।३४।। अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ।।३५।। एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूरुपता ।।३६।। एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण । पावती वेळे ।।३७।। हे मार्गु तरी दोनी । परी एकवटती निदानीं । जैसी सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ती एकी ।। ३८।। कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहता । मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ।।३९।। तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते- । आधीन असे ।।४० देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केविं तैसा । पावे वेगा ।।४१।। तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ।।४२।। तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ।।४३।। येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ।।४४।।
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ।।४।।
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ।।४५।। कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ।।४६।। सांगे पैलतीरा जावें । ऐसे व्यसन कांं जेथ पावें । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ।।४७।। नातरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केविं सांगें ।।४८।। जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ।।४९।। म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ।।५०।। आणि आपुलालिया चाडे । आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ।।५१।। हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखो पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ।।५२।।
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ।।५।।
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ।।५३।। देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ।।५४।। सांगें श्रवणीं ऐकावे ठेलें । कीं नेत्रींचें तेज गेलें । हे नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ।।५५।। ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । कीं क्षुधातृष्णादि आर्ति । खुंटलिया ।।५६।। हें स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्म मृत्यू ।।५७।। हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिले तें कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंतां ।।५८।। कर्म पराधीनपणें । निपजत असे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकली अंत:करणें । वाहिजे वायां ।।५९।। देखें रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ।।६०।। कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ।।६१।। तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । निष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ।।६२।। म्हणऊनि संगु जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाही करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ।।६३।।
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ।।६।।
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ।।६४।। तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनी सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ।।६५।। ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । वोळखावे तत्त्वतां । येथ भ्रांति नाहीं ।।६६।। आतां देर्इं अवधान । प्रसंगें तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ।।६७।।
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिष्यते ।।७।।
जो अंतरीं दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रुढु । लौकिकु जैसा ।।६८।। तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्तकर्म न अव्हेरी । उचित जें जें ।।६९।। तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मीं । झांकोळेना ।।७०।। तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ।।७१।। तैसा संसर्गामाजीं असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ।।७२।। तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ।।७३।। ऐसा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । ओळख पां ।।७४।। अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपें तूंतें ।।७५।। तूं मानसा नियमु करीं । निश्चळु  होय अंतरीं । मग कर्मेंद्रियेंही व्यापारीं । वर्ततु सुखें ।।७६।।
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण: ।।८।।
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवें । आणि निषिद्ध केविं राहाटावे । विचारी पां ।।७७।। म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचर तूं ।।७८।। पार्था आणिकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ।।७९।। देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ।।८०।।
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन: ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तस: समाचर ।।९।।
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ।।८१।। हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मीं रती घडे । तैंचि बंधु पडे । संसारिकु ।।८२।। म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच नाही ।।८३।। हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणोनियां ।।८४।। आतां येचिविषीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ।।८५।।
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति: ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ।।१०।।
तैं नित्य यागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनि ।।८६।। ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां  । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ।।८७।। तुम्हा वर्णविशेषवशें । आम्ही हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ।।८८।।  तुम्ही व्रते नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरि केंही न वचावें । तीर्थासी गा ।।८९।। योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्र यंत्र विधानें झणी करा ।।९०।। देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्ही स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ।।९१।। अहेतुकें चित्ते । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ।।९२।। तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जाहला ।।९३।। देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजा हो न संडील । तुमतें कदा ।।९४।।
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु व: ।
परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ ।।११।।
जें येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सितां । अर्थांतें देती ।।९५।। या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ।।९६।। तुम्ही देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीती जेथ ।।९७।। तेथ तुम्ही जें करूं म्हणाल । तें अपैसें सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ।।९८।। वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ।।९९।। जैसे ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ।।१००।।
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता: ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स: ।।१२।।
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ।।१।। ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ।।२।। कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ।।३।। तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ती दिधली पुरी । तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल जो ।।४।। अग्निमुखी हवन । न करील देवतापूजन । प्राप्तवेळें भोजन । भुकेलियाचें ।।५।। विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ।।६।।  ऐसा स्वधर्मुक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु होईल जो ।।७।। तया मग अपावो थोरु आहे । जेणें ते हातींचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ।।८।। जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाचां घरी । न राहे लक्ष्मी ।।९।। तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ।।११०।। तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ।।११।। म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचे ।।१२।। मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रीसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं ।।१३।। तैसीं त्रिभुवनींचीं दु:खें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ।।१४।। ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां । परी कल्पांतींही सर्वथा । प्राणिगण हो ।।१५।। म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ।।१६।। जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणी मरण मांडे । हा स्वधर्मु तेंणे पाडें । विसंबो नये ।।१७।। म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावे पुढतपुढती । म्हणिपत असें ।।१८।।
यज्ञशिष्टाशिन: सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।।१३।।
देखा विहित क्रियाविधी । निर्हेतुका बुद्धि । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ।।१९।। गुरु गोत्र अग्नी पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ।।१२०।। या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशी हवन करितां । हुतशेष स्वभावता । उरे जें जें ।।२१।। तें सुखें आपुलां घरी । कुटुंबेसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ।।२२।। तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अघीं । जयापरी महारोगी । अमृतसिद्धी ।।२३।। कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ।।२४।। म्हणोनि स्वधर्में जे अर्जे । ते स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेसीं ।।२५।। हें वांचुनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । मुरारी सांगें ।।२६।। जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ।।२७।। हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसा ते बरळ । अहंबुद्धी केवळ भोगूं पाहती ।।२८।। इंद्रियरुचीसारखें । करविती पाक निकें । ते पापिये पातकें । सेविती जाण ।।२९।। हेें संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ।।१३०।। हे सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ।।३१।। जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियांं ।।३२।। हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जें जीवनहेतुकारण । विश्वा यया ।।३३।।
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: ।।१४।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।।१५।।
अन्नास्तव भूतें । प्ररोह पावती समस्तें । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ।।३४।। तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ।।३५।। मग वेदांतें परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हें चराचर । ब्रह्मबद्ध ।।३६।। परी कर्माचिये मूर्ती । यज्ञीं अधिवासु श्रुती । ऐकें सुभद्रापती । अखंड गा ।।३७।।
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह य: ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।१६।।
ऐसी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनियां ।।३८।। म्हणूनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ।।३९।। तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी । जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ।।१४०।। तें जन्मकर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ।।४१।। कां गळां स्तन अजेचें । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ।।४२।। म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ।।४३।। हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य ओघें आले । मग उचित कां आपुलें । ओसंडावें ।।४४।। परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ।।४५।।
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ।।१७।।
देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ।।४६।। जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला । म्हणोनि सहजें सांडवला । कर्मसंगु ।।४७।।
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रय: ।।१८।।
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ।।४८।। जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ।।४९।।
तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ।।१९।।
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें । ।।१५०।। जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्य पर तत्त्वतां । पावले जगीं ।।५१।।
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ।।२०।।
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ।।५२।। या कारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ।।५३।। जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ।।५४।। देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ।।५५।। मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा । आचरोनी ।।५६।। हां गा ऐसें न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे । तिहीं कवणेंपरी जाणिजे । मार्गातें या ।।५७।।
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।२१।।
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ।।५८।। हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावेंं । विशेषें आचरावेंं। लागे संतीं ।।५९।।
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ।।२२।।
आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगो काई किरिटी । देखें मीचि इये राहाटीं । वर्तत असें ।।१६०।। काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ।।६१।। तरी पुरतेंपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं ।।६२।। मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ।।६३।।
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रित: ।
मम  वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।२३।।
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा- । लागोनियां ।।६४।। जें भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणोनियां ।।६५।।
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमा: प्रजा: ।।२४।।
आम्ही पूर्णकाम होऊनि । जरी आत्मस्थिती राहूनि । तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ।।६६।। इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । ते लौकिक स्थिति आघवी । नासिली होईल ।।६७।। म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञतें । तेणें सविशेषें कर्मातें त्यजावें ना ।।६८।।
सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ।।२५।।
देखें फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ।।६९।। जे पुढत पुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ।।१७०।। मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरे लावावे । अलौकिक नोहावे । लोकांप्रति ।।७१।।
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम  ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वानयुक्त: समाचरन् ।।२६।।
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केविं जेवी । म्हणोनि बाळका जैसीं नेदावीं । धनुर्धरा ।।७२।। तैसी कर्मीं जयां अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ।।७३।। तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । निष्कर्मींही दावावी । आचरोनी ।।७४।। तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ।।७५।। जैसी बहुरूपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोक संपादणी । तैसीच करिती ।।७६।।
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकार विमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ।।२७।।
देखें पुढिलाचें ओझे । जरी आपुला माथां घेइजें । तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ।।७७।। तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निफजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ।।७८।। ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ।।७९।। हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ।।१८०।।
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयो: ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ।।२८।।
जें तत्त्वज्ञानियांचा ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ।।८१।। ते देहाभिमानु सांडुनि । गुणकर्में वोलांडूनि । साक्षिभूत होऊनि । वर्तती देहीं ।।८२।। म्हणोनि शरीरीं जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ।।८३।।
प्रकृतेर्गुणसंमूढा: सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ।।२९।।
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रक्रतीचेनि आटोपें । वर्ततु असे ।।८४।। इंद्रिये गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ।।८५।।
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ।।३०।।
तरी उचिते कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ।।८६।। हें कर्म मी कर्ता । कां आचरेना या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिघों देसी ।।८७।। तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावें । भोग सकळ ।।८८।। आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं । देर्इं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ।।८९।। जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । यया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ।।१९०।। आतां पार्था नि:शंकु होर्इं । या संग्रामा चित्त देर्इं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ।।९१।।
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा: ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मूच्यन्ते तेऽपि कर्मभि: ।।३१।।
हें अनुपरोध मत माझें । जिही परमादरे स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ।।९२।। तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हे निश्चितु । करणीय गा ।।९३।।
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतस: ।।३२।।
नातरी प्रकृतिमंतु होऊनि । इंद्रियां लळा देऊनि । जे हें माझें मत अव्हेरुनि । ओसंडिती ।।९४।। जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । का हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ।।९५।। ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ।।९६।। देखें शवाचां हातीं दिधलें । जैसें कां रत्न वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ।।९७।। कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।।९८।। तैसे जे पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसीं भाषण सर्वथा । करावेंना ।।९९।। म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगें पतंग काय साहाती । प्रकाशातें ।।२००।। पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ।।१।।
सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति ।।३३।।
म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनी पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ।।२।। हां गा सर्पेसीं खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ।।३।। देखें खेळतां अग्नी लागला । मग तो न सांवरे जैसा उधवलां । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ।।४।। ये-हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नानाभोगरचना मेळवावी ।।५।। आपण सायासें करूनि बहुतेंं । सकळही समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ।। ६।। सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणे स्वधर्मु सांडूनि देहातें पोखावें काई ।।७।। मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ।।८।। म्हणूनि केवळ देहभरण । तें जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंत:करण । देयावेना ।।९।।
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ।।३४।।
ए-हवीं इंद्रियांचिया अर्था- । सारिखा विषयो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ।।२१०।। परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ।।११।। बापा विषयाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ।।१२।। देंखे इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजें गा ।।१३।। परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनी जाये । तो जैसा ठांउवा नोहे । झांकलेंपणें ।।१४।। तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ।।१५।। जैसा कवळोनिया पारधी । घातेचिये संधी । आणी मृगाते बुद्धि । साधावया ।।१६।। एथ तैसीचि परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ।।१७।। म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकू निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ।।१८।।
श्रेयान् स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।३५।।
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाची अनुष्ठिला । भला देखें ।।१९।। येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनी आचरावा । आपुलाचि ।। २२० ।। सांगें सदैवाघरीं आघवीं । पक्वान्नें आहाती बरवीं । तीं बळेचि केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ।।२१।। हें अनुचित कैसेनी कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ।।२२।। तरी लोकांची धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ।।२३।। हे असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली । तऱ्ही  भोगितां तेचि भली । जियापरी ।।२४।। तेवि आवडे तैसा सांकडु । आचरतां जऱ्ही दुवाडु । तऱ्ही स्वधर्मुचि सुरवाडु । पारत्रिकीचा ।।२५।। हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ।।२६।। ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीचि उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ।।२७।। म्हणोनी आणिकांसि जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजें ।।२८।। या स्वधर्मातेंं अनुष्ठितां । वेंचु होईल जीविता । तोही निका वर उभयतां । दिसत असे ।।२९।। ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशारंगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ।।२३०।। हें जें तुम्ही सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ।।३१।।
अर्जुन उवाच :
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष: ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित: ।।३६।।
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे । मार्गु सांडुनी अनारिसे । चालत देखों ।।३२।। सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ।।३३।। बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ।।३४।। जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ।।३५।। आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बलात्कारें सुइजती । तयाची माजीं ।।३६।। जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसी । चुकविती ते गिंवसी । तयातेंची ।।३७।। ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ।।३८।।
श्रीभगवानुवाच :
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव: ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ।।३७।।
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आईक ।।३९।। तरी हे कामक्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं । हे कृतांताचां ठायीं मानिजती ।।२४०।। हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गींचे ठग । मारक जे ।।४१।। हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड । यांचें व्यामोहादिक बंड । जगावरी ।।४२।। हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचें । अविद्या केलें ।।४३।। हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ।।४४।। हे मृत्यूचां नगरीं । मानिजती निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ।।४५।। जयांसी भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांची आशा । चाळीत असे ।।४६।। कौतुकें कवळितां मुठी । जिये चवदा भुवनें थेंकुटी । ते भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ।।४७।। जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ।।४८।। हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणें जग आपुलेनी भोजें । नाचवीत असे ।।४९।। जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ।।२५०।। साध्वी शांति नागविली । मग माया ठगी शृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ।।५१।। इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ।।५२।। इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिलें । उपडूनियां ।।५३।। इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपि पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ।।५४।। हे आंगा तंव घडले । जीवींची आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ।।५५।। हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाचां एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ।।५६।। हे जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ।।५७।। हे शस्त्रेंवीण साधिती । दोरेंवीण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनी ।।५८।। हे चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ।।५९।।
धूमेनाव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ।।३८।।
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपें व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ।।२६०।। कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ।।६१।। तैसें इहींवीण एकलें । आम्ही ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनी पां गुंतलें । बीज निपजे ।।६२।।
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ।।३९।।
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणोनी तें अगाध । होऊनी ठेलें ।।६३।। आधीं यातें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ।।६४।। यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं । तें इंधन जैसे आगी । सावावो होय ।।६५।।
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ।।४०।।
तैसे उपाय किजती जे जे । ते यांसीची होती विरजे । म्हणोनी हटियांतें जिणिजे । इहींची जगीं ।।६६।। ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ।।६७।।
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।।४१।।
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळूनि घाली तियें । सर्वथैव ।।६८।।
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन: ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स: ।।४२।।
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनी थारा मोडेल । या पापियांचा ।।६९।।
एवं बुद्धे: परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ।।४३।।
हे अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ।।२७०।। तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ।।७१।। जे गुरुशिष्याची गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनी नुठी । कवणे काळीं ।।७२।। ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ।।७३।। आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ।।७४।। तया बोलाचा हन पाडु । कां रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ।।७५।। ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोगा बापा ।।२७६।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा समाप्त ।। (श्लोक : ४३; ओव्या : २७६)


।। पुंडलिक वरदाऽऽहरी विठ्ठल श्रीऽऽज्ञानदेव तुकाऽऽराम ।।